Author: maharashtrabreakingnews.com

बारामती, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अजित पवार यांचा अपघाती मृत्यू हा महाराष्ट्राला प्रचंड मोठा धक्का आहे. एक कर्तृत्ववान आणि निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात होती अशा व्यक्तीला महाराष्ट्र आज मुकला. जे काही नुकसान झालंय ते भरून निघणार नाही; पण, सगळ्याच गोष्टी काही आपल्या हातात नसतात. मी आज मीडियासमोर येणार नव्हतो; पण, काही माध्यमांमध्ये अपघातामागे काही राजकारण आहे, अशा प्रकारची भूमिका कोलकातावरून मांडली गेली, असं कळलं. पण, यात राजकारण नाही. हा निव्वळ अपघात आहे, असे स्पष्ट मत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. शरद पवार म्हणाले, या मृत्यूच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपया त्यात राजकारण आणू नये एवढंच सांगायचं…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्राच्या राजकारणातील एक खरा लोकनेता, कामगार-कष्टकरी, वाहतूकदार तसेच ऑटो-टॅक्सी चालकांचा आधारवड असलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेत अचानक निधन झाल्याने राज्यभर शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेने विशेषतः असंघटित क्षेत्रातील लाखो कष्टकऱ्यांसाठी हा दिवस अंधकारमय ठरला असल्याची भावना ऑटो-टॅक्सी कामगार संघटनेचे व असंघटित कष्टकरी जनतेचे नेते डॉ. बाबा कांबळे यांनी व्यक्त केली. डॉ. कांबळे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, “अजितदादा हे केवळ राजकीय नेते नव्हते, तर गोरगरिबांचे, रस्त्यावर राबणाऱ्या ऑटो-टॅक्सी चालकांचे, कामगार-कष्टकऱ्यांचे खरे साथीदार होते. त्यांच्या मनात नेहमीच सर्वसामान्य माणसाची काळजी होती. उपमुख्यमंत्री पदावर असतानाही सामान्य माणसाशी आपुलकीने वागणारा नेता आज आपल्यातून गेला…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आज सकाळी झालेल्या विमान अपघातात दुःखद निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाची बातमी अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायक असून महाराष्ट्राने एक धडाडीचे, लोकाभिमुख आणि करारी नेतृत्व गमावले आहे, अशी भावना आमदार महेश किसनराव लांडगे यांनी व्यक्त केली. आमदार लांडगे यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, “अजितदादांसारखा प्रचंड कामाचा आवाका असणारा नेता पुन्हा होणे नाही. पहाटे सहा वाजेपासून जनतेच्या प्रश्नांसाठी तळमळीने काम करणारे ते खरे लोकसेवक होते. त्यांच्या जाण्याने एक प्रभावी आणि निर्णयक्षम नेतृत्व हरपले आहे.” राज्याच्या जडणघडणीत अजितदादा पवार यांनी दिलेले योगदान महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवेल, असे सांगत आमदार लांडगे यांनी त्यांच्या कार्याचा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – १९९२ पासून दादांच्या सानिध्यात काम करण्याचा अनुभव असल्याचे सांगत पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दादांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. दादांच्या जाण्याने आम्ही घरचा माणूस गमावला असून संपूर्ण उद्योगजगत पोरके झाले आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. “आम्ही प्रश्न मांडायचो आणि उत्तर ते सोडवायचे—हे जणू ठरलेलेच गणित होते. कोणतीही अडचण असो, दादे थेट संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका लावून जागेवर प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असायचे,” असे बेलसरे म्हणाले. उद्योगधंद्यांना बळकटी देण्यासाठी दादांनी सातत्याने पुढाकार घेतला. लघुउद्योजकांचे प्रश्न, अडचणी आणि मागण्या शासनदरबारी प्रभावीपणे मांडून त्यांनी उद्योजकांना मोठा आधार दिला. कुदळवाडी येथील प्रश्नावर नुकतीच दादांसोबत भेट झाल्याचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी विमान दुर्घटनेत अपघाती निधन झाले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, शहर अभियंता मकरंद निकम,नगररचना उपसंचालक किशोर गोखले,मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण जैन, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, उप आयुक्त अण्णा बोदडे, संदीप खोत, राजेश आगळे, चेतना केरूरे,विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिका कर्मचारी उपस्थित…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व आमदार अमित गोरखे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावनिक श्रद्धांजली अर्पण करणारा संदेश सोशल मीडियावर शेअर केला आहे. या संदेशामध्ये त्यांनी अजित पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदान, लोकाभिमुख नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख केला आहे. अमित गोरखे यांनी आपल्या श्रद्धांजली संदेशात म्हटले आहे की, स्पष्टवक्तेपणा, ठाम निर्णयक्षमता आणि जनतेशी असलेले नाते यामुळे अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळे स्थान निर्माण केले. अर्थमंत्रीपदाच्या काळात राज्याच्या विकासासाठी, महिला सक्षमीकरण, शेतकरी कल्याण आणि युवकांसाठी राबवलेल्या योजनांचे योगदान अतुलनीय असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. ते खऱ्या अर्थाने विकासाचे दादा होते.. या भावनिक संदेशात…

Read More

अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्रावर शोककळा – आमदार शंकर जगताप पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “आपली जन्मभूमी बारामती असली तरी माझी कर्मभूमी पिंपरी-चिंचवड आहे,” असे निक्षून सांगणारे आणि पिंपरी-चिंचवड शहरावर पुत्रवत प्रेम करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली झालेले अपघाती निधन मनाला चटका लावून जाणारे आहे,” अशी भावना आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केली. पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे ते खरे ‘दादा’ होते असेही आमदार जगताप पुढे म्हणाले. आमदार शंकर जगताप पुढे म्हणाले, “अजित पवार हे केवळ ज्येष्ठ नेते नव्हते, तर चणाक्ष राजकारणी, अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि प्रशासकीय कारभाराचा दांडगा अनुभव असलेले कर्तबगार नेतृत्व होते. अशा व्यक्तिमत्त्वाचे आपल्या मधून जाणे हे केवळ…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी, निर्णयक्षम आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले नेतृत्व गमावले आहे, अशी भावना व्यक्त करत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. नखाते म्हणाले की, अजितदादा पवार यांना अनेक वेळा विविध कामे तसेच असंघटित कामगारांच्या ज्वलंत समस्यांवर भेटण्याचा योग आला. प्रत्येक वेळी दिलेले निवेदन ते अत्यंत लक्षपूर्वक वाचायचे. विषय कोणताही असो, त्यावर त्वरित मत स्पष्ट करणे आणि संबंधित मुद्द्यांचा सखोल अभ्यास करून निर्णय घेणे ही त्यांची खास कार्यशैली प्रत्यक्ष अनुभवण्यास मिळाली. निवेदन दिल्यानंतर ते लगेचच सोबत असलेल्या स्वीय सहाय्यकांना संबंधित विभागाकडे कार्यवाहीसाठी पाठवण्याचे आदेश द्यायचे.…

Read More

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं कधीही भरून न येणारी महाराष्ट्राची हानी झाली आहे. आज त्यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. अजित पवार महाराष्ट्राचे लोकनेते होते. महाराष्ट्रातल्या प्रश्नांची जाण असलेला हा नेता होता. त्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड आस्था होती. अतिशय संघर्षशील असं नेतृत्व होते. सर्व परिस्थितीत न डगमगता पुढे जाणारे व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत कठीण दिवस आहे अशी शोक भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. अजित पवारांच्या निधनावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवारांसारखे नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासात ते महत्त्वपूर्ण योगदान देत होते,…

Read More

बारामती, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आहे. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. डीजीसीएने या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या आज बारामतीमध्ये सभा होणार होत्या. त्या सभांसाठी अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून बारामती येथे निघाले होते. दरम्यान, त्यांचं विमान बारामती विमानतळावर उतरत असताना विमानाला अपघात होऊन ते जवळच्या शेतात कोसळलं.

Read More