पिंपरी येथील सेंट्रल पंचायत आणि भारतीय सिंधू सभा संस्थेच्यावतीने सिंधी समाज मिलन कार्यक्रम संपन्न

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी येथील बी टि आडवाणी धर्मशाळेत पिंपरी येथील सेंट्रल पंचायत आणि भारतीय सिंधू सभा या संस्थेच्या वतीने पिंपरी मधील सिंधी समाज मिलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला मिलिंदजी परांडे केंद्रीय महासचिव विश्र्व हिंदू परिषद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या वेळी बोलताना त्यांनी केंद्र सरकारने जो सी ए ए चा कायदा देशात लागू केला त्या कायद्याच्या संदर्भात सिंधी बांधव हे १९४७ साली देशाची फाळणी झाल्यावर आपल्या भारतात येऊन स्थायिक झाले आहेत आणि आज या सिंधी बांधवांचे नातेवाईक सुध्दा भारतात येऊन स्थायिक होत आहेत परंतु त्यांना काही तांत्रिक कारणांमुळे येण्यास विलंब होत आहे याची कारणे काय आहेत आणि त्या साठी कोणती कागदपत्रे काळजी पूर्वक सरकार दरबारी सादर केली पाहिजेत याची विस्तृत माहिती त्यांनी दिली.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की आता या वर्षी जवळपास ४ लाख पाकिस्तान मधे राहणारे सिंधी बांधव भारतात येण्यासाठी प्रयत्न करीत आहेत परंतु पाकिस्तान सरकार कडून काही मुद्दामहून अडथळे निर्माण केले जात आहेत.त्यासाठी त्यांनी एक महाराष्ट्रात विविध शहरांमध्ये सिंधी बांधव स्थायिक झालेला या प्रत्येक प्रमुख शहरांमध्ये जाऊन एका शहरातुन किमान चार,पाच प्रमुख सिंधी बांधव एकत्र येऊन एक महाराष्ट्रात समिती स्थापन करून आणि विश्र्व हिंदू परिषद या दोन्ही पदाधिकारी एकत्रित येऊन केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून त्या नागरिकांना भारतात आणावे,या बरोबरच जे सिंधी आणि शिख बांधव २०१४ नंतर भारतात येऊन राहिले आहेत यांना नागरिकत्व देण्यात आले आहे कीवां नाही याची पडताळणी देखील या समितीने करावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या वेळी किशोर चव्हाण पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री, सेंट्रल पंचायत चे संस्थापक शिवनदास पमनानी, कार्याध्यक्ष गोपीचंद आसवांनी, महासचिव श्रीचंद नागरानी उपाध्यक्ष मनोहर जेठवानी,इंदर बजाज, ज्योतिका मलकानी, अजित कंजवानी,इंद्रा पुनावाला, सुरेश हेमनानी प्रदेशाध्यक्ष भारतीय सिंधू सभा, महेश मोटवानी, हिरानंद रिझवानी, तुलसीदास तलरेजा,सुनील केसवानी तसेच धनंजय गावडे विश्र्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री, नितीन वाटकर विश्र्व हिंदू परिषद पुणे ग्रामीण विभाग मंत्री, आदी उपस्थित होते कार्यक्रमास सिंधी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील बजाज यांनी केले तर आभार मनोहर जेठवानी यांनी मानले.









