ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र
ओबीसी जनगणना ही केवळ निवडणुकीपुरती घोषणा? – विजय वडेट्टीवार यांचा सवाल

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “भाजप सरकार हे बाबासाहेब आंबेडकर व गांधीजींच्या विचारांचे नसून, आरएसएस व मनुवादी विचारांचे आहे. त्यामुळे ओबीसी, आदिवासी, मागासवर्गीयांचा खरा विकास या सरकारकडून अपेक्षित नाही,” असे ते म्हणाले. जातीनिहाय जनगणनेची घोषणा निवडणुकीसाठीच करण्यात आली का, अशी शंका माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानच आपला खरा रक्षणकर्ता आहे,” असे ते म्हणाले.
काँग्रेस ओबीसी सेलच्या वतीने पूर्णा नगर चिंचवड येथे आयोजित ओबीसी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी अखिल भारतीय कॉंग्रेसचे सचिव पृथ्वीराज साठे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी, जालन्याचे आमदार राजेश राठोड, अ. भा. ओबीसीचे निरीक्षक राजेंद्र राख , प्रदेश सरचिटणीस बाबू नायर, काँग्रेसचे शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम, शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती विष्णूपंत
नेवाळे, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष सोमनाथ शेळके, डॉक्टर सेलच्या अध्यक्षा डॉ मनीषा गरुड, गौतम
आरकडे, मनोज कांबळे, उपाध्यक्ष भरत वाल्हेकर, नरेंद्र बनसोडे, छाया शेळके, अमोल कदम, प्रवीण
जांभळे, अनिता धर्माधिकारी, राणी कोरडे, जमादार हुसेन, आलम शेख आदी उपस्थित होते.
वडेट्टीवार पुढे म्हणाले कि,जाती-जातीत भांडणं लावून आपली पोळी शेकायची आणि ती नाही जमली तर हिंदू खतरे हैं असं म्हणून धर्माची दरी निर्माण करायची. हे भाजपचे कारनामे आहेत. देशात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत उच्च पदावर हिंदू बसलेले
आहे. हिंदूंची ८५% लोकसंख्या आहे.तर १५ टक्के मुस्लिमांची संख्या आहे.१५ टक्के मुस्लिम हिंदूंना संपवतील का ?मात्र हिंदू खतरे मे हैअशी
भीती दाखवली जाते. कारण ओबीसी, दलित, बहुजन,मागासवर्गीयांनी आपला हक्क मागू नये. आपला नाकर्तेपणा लपवण्यासाठी भाजप धर्मांचा आधार घेत आहे. केलेली कामे सांगू शकत नाही, अशा वेळी लोकांचा बळी घेऊन धर्मांची पोळी शेकून
सध्या राजकारण सुरू आहे. जेव्हा जेव्हा समाज आपल्या हक्कासाठी लढाईसाठी तयार होतो तेव्हा तेव्हा भाजपकडून धर्माची भिंत उभी केली
जाते. आगामी निवडणुका नसत्या ..तर सरन्यायाधीश गवई यांचे नाव सुवर्ण अक्षराने लिहिले जाईल.
इसाईल च्या कंपनीने ३३ देशातील ईव्हीएम मशीन हॅक करून निकाल बदलल्याची कबुली दिली. हे जनतेचे सरकार नाही. राज्यात केवळ
५०-५५ जागा येतील असा सर्वांचा अंदाज असताना एकदम इतक्या जागा कशा काय जिंकल्या? देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या
आई कमताई यांनी देखील बॅलेट पेपर वर निवडणुका घेण्याची इच्छा व्यक्त केली. ही इच्छा जर सर्वोच्च पदावर विराजमान गवई साहेबांनी पूर्ण
केली तर त्यांचे नाव जगाच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरले जाईल. आणि देशातील निवडणुका पारदर्शी होईल. असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.
तर छगन भुजबळांचा राज्याभिषेक झाला नसता. अशी टीकाही त्यांनी केली राज्यातील तीन पक्षांचे
सरकार टिकणार का असा प्रश्न करून वडेट्टीवार म्हणाले की, तिन्ही पक्षाचे नेते एकत्र आल्यावरच गोड गोड वागतात. पाठ फिरले की त्यांची धुसफूस सुरू
होते. केवळ आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून छगन भुजबळांचा त्यांनी राज्याभिषेक करून घेतला.
ओबीसींची मत आपल्या पारड्यात पाडून घेण्याचा हेतू आहे. भाजप हा धूर्त आणि बेईमानी पक्ष आहे. तो
ठराविक लोकांसाठी काम करत आहे.
लाडकी बहीण योजने सारख्या राबवण्यासाठी पैसा
योजना लागतो. अभाव असल्याने आदिवासी विभाग सामाजिक न्याय विभागाचा निधी वापरला जातोय. राज्यावर कर्जाचा डोंगर करून काय लाडकी बहीण योजना राबवणार? तिन्ही पक्षांनी प्रचंड लूट सुरु केली आहे.
मुंबईतील मोक्याच्या जागा उद्योगपती अदानीच्या घश्यात घातल्या आहेत असा आरोप वडेट्टीवार यांनी केला
पिंपरी महापालिकेची श्रीमंत या महापालिका अशी ख्याती होती. मात्र ससे, कोल्हे, लांडगे यांनी एकत्र
येऊन पालिका ओरबाडून खाल्ली..भ्रष्टाचार वाढला आहे.असा आरोप त्यांनी केला.सूत्र संचालन राहुल शिंपले यांनी तर आभार मुजावर मोहम्मद
यांनी मानले.









