मोदी सरकारने ७० वर्षांनी खऱ्या लोकांना न्याय दिला – आमदार उमा खापरे

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड प्राधिकरण मंडलाच्यावतीने केंद्र सरकारने जातीविहाय जनगणना करण्याचा निर्णय केला. त्याबद्दल जयदीप खापरे (मंडळ अध्यक्ष) यांनी आनंद उत्सव करण्याचा कार्यक्रम मंडळाने घेतला आहे.
१ मे २०२५ रोजी केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना करण्याचे जाहीर केले. देशामध्ये १९३१ साली इंग्रजांनी जातीनिहाय जनगणना केली होती .त्यानंतर प्रथमच मोदी सरकारने निर्णय घेतला ज्या काँग्रेसला ७० वर्षांमध्ये जमले नाही त्यांनी चुकीचे म्हणणे सांगून दिशाभूल करू नये. जातीनिहाय जनगणना केल्या छोट्या व शोषित विकास बाजूला पडलेल्या समाजाचा विकास होईल. त्यामुळे देशाची प्रगती होईल त्या समाजाच्या लोकसंख्येच्या विकास होईल. त्याबद्दल मोदी सरकारचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.
ऍड. वर्षा डहाळे, आ. अमित गोरखे , सदाशिव खाडे, केशव घोळवे, अनुराधा गोरखे ,मोरेश्वर शेडगे, सतीश नागरगोजे, राहुल खाडे,संदेश गादिया ,आशा काळे निता कुशारे ,गीता महेन्दु इत्यादी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जयदीप गिरीश खापरे,
(प्राधिकरण चिंचवड मंडल अध्यक्ष)













