आपण सर्व राज्यांमध्ये सर्वच घटकांना पाच लाख रुपये पर्यंतचे उपचार मोफत मिळतील अशी घोषणा केली , परंतु परिस्थिती त्याच्या विपरीत आहे.
सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत, अपुरे मनुष्यबळ , डॉक्टरांची कमतरता, औषधांचा तुटवडा, असल्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळत नाहीत याचा थेट परिणाम काही रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. बऱ्याच वेळा रुग्ण हा खाजगी रुग्णालयात जिथे योजना आहे तिथे दाखल होण्यासाठी जात आहे तिथे परिस्थिती इतकी भयानक की अगोदरच पैसे भरा मगच तुम्हाला ऍडमिशन दिलं जाईल ? असं सांगण्यात येतं. रुग्ण हा योजनेत समाविष्ट असताना देखील त्याच्याकडून औषधाचे पैसे , इम्प्लांट , च्या नावाखाली पैसे लाटले जात आहेत. एक प्रकारे सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांची हेळसांड होताना दिसत आहे. शासनाने नेमून दिलेले योजनेचे कार्यकारी अधिकारी श्री रमेश चव्हाण निव्वळ झोप काढत दिसत आहे , रुग्णालयांशी संगणमत करून पैसे लुटण्याचा काम त्यांचं चालू आहे. असंख्य तक्रारी यांच्याकडे प्राप्त झाले असून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई रुग्णालयांवरती होताना दिसत नाही. उच्चस्तरीय समिती स्थापन करून त्याची चौकशी चे आदेश द्यावेत व या भ्रष्ट अधिकाऱ्यावर हक्कभंगाची कारवाई करून या अधिकाऱ्याला कामावरून बडतर्फ करावे. जेणेकरून सर्व राज्यातील योजना समाविष्ट रुग्णालय व्यवस्थित काम करतील त्यांच्यावरती चपराक बसेल व सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना त्यांच्या उपचारासाठी दिलासा मिळेल, असे ही दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्यावर हक्क भंगाची कारवाई करा – डॉ. सतिश दत्तात्रय कांबळे
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण यांच्यावर हक्क भंग कारवाई करून सेवेतून हकालपट्टी केल्यास राज्यातील सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना न्याय मिळेल या मागणीचे निवेदन शरद पवार संजीवनी आरोग्य मित्रचे राज्यप्रमुख डॉ. सतिश दत्तात्रय कांबळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या राज्यातील परिस्थिती सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांसाठी आरोग्य सेवा मिळणे खूप भयानक झालेले आहे , खाजगी योजना समाविष्ट रुग्णालय जुन्या पिक्चर मधील डाकू मंगलसिंग चे चोरीचे अड्डे झालेले आहेत, त्यांना भस्म्या आजार जडला आहे , मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांची बिलासाठी लूट करताना दिसत आहेत.

