Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीपुरवठ्याचा प्रश्न अधिक गंभीर होत असल्याने पुढील २५ वर्षांचा विचार करून पाणी व्यवस्थापनाचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली. महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार त्यांनी माजी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून स्वीकारल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना शहरातील पाणीपुरवठा, विकासकामे आणि आर्थिक स्थिती याबाबत सविस्तर माहिती दिली. भामा-आसखेड जलवाहिनी प्रकल्पाचा ठेकेदार कामात विलंब झाल्यामुळे बडतर्फ करण्यात आला असून उर्वरित कामांसाठी लवकरच नव्याने निविदा काढण्यात येणार आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी सुमारे सात महिन्यांचा कालावधी अपेक्षित असून त्यानंतर शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी सांगितले. पवना बंदिस्त…

Read More

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी महाराष्ट्र शासनाचे ॲप सुरू करण्यासाठीही प्रयत्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्रातील रिक्षा व टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे रिक्षा-टॅक्सी चालक महामंडळाला गती देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे आश्वासन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. तसेच रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी राज्य शासनाचे स्वतंत्र ॲप विकसित करण्याचे काम सुरू असून ते लवकरच सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील रिक्षा चालकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी आज विधान भवन मुंबई येथे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी रिक्षा-टॅक्सी चालकांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. रिक्षा चालकांच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नातून…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) आयुक्तपदी नियुक्त झालेले डॉ. विजय नामदेव सूर्यवंशी यांनी आज प्रभारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडून अधिकृतपणे पदभार स्वीकारला. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेला अतिरिक्त पदभाराचा कालावधी संपुष्टात आला असून महापालिकेला अखेर पूर्णवेळ आयुक्त मिळाले आहेत. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त शेखर सिंह यांची ७ ऑक्टोबर २०२५ रोजी नाशिक कुंभमेळा आयुक्तपदी बदली करण्यात आली होती. त्यानंतर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. गेल्या सुमारे पाच महिन्यांपासून ते ही जबाबदारी सांभाळत होते. दरम्यान, आयुक्तपदाचा अतिरिक्त पदभार असल्यामुळे महापालिकेच्या प्रशासनात केवळ अत्यावश्यक कामांनाच प्राधान्य दिले जात असल्याची भावना काही पदाधिकाऱ्यांकडून…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पत्रकारिता आणि साहित्याचा जवळचा संबंध आहे. पत्रकारांनी वेगवेगळ्या क्षेत्रात रस निर्माण करून काम करावे. त्यामुळे लिखाण व्यापक, फुलेल आणि बहुअंगी होईल. पत्रकारांनी प्रचंड वाचन केले पाहिजे. मोजके आणि सकस लिहिले पाहिजे. वाटेल ते लिहू नये. चुकीवर प्रहार करावा आणि चांगल्याला चांगले म्हणावे, त्याचे कौतुक करावे. पत्रकारांनी भूमिका घेतली पाहिजे. पत्रकारिता संपली, तर समाज संपेल, असे मत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. हेमंत देसाई यांनी व्यक्त केले. पत्रकारांना वेगळी नजर असली पाहिजे आणि ते टिपून छापता आले पाहिजे, असेही ते म्हणाले. अखिल मराठी पत्रकार संस्था महाराष्ट्र राज्य संलग्न पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ आयोजित “पीसीएमसी टॉप…

Read More

पीसीसीओइ मध्ये महिला दिन साजरा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  ‘ती’ ने फक्त घरातील जबाबदाऱ्यांपुरतं मर्यादित न राहता स्वतःच्या करिअर आणि वैयक्तिक आकांक्षा शोधून पुढे यावे. ‘ती’ ने आत्मविश्वास आणि दृढ निश्चयाने व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवन दोन्हीचे संतुलन साधावे. तसेच इतरांचे अनुकरण करण्यापेक्षा ‘स्व’ ची ओळख स्वीकारली तर जीवनात आनंद मिळेल. सर्व क्षेत्रात आता महिला महत्त्वाच्या भूमिका बजावत आहेत. आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिला सक्षमीकरणाचा उत्सव आणि विविध क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीची ओळख आहे असे पीसीइटीच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले यांनी सांगितले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय (पीसीसीओइ) येथे महाविद्यालय अंतर्गत तक्रार समिती यांच्या सहकार्याने महिला दिनाचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी चांगलीच गाजली. शहर विकास आराखडा, जकात नाका जागेचा वापर आणि स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामांवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये तीव्र वाद रंगला. “स्मार्ट सिटी की डर्टी सिटी?” असा सवाल उपस्थित करत नगरसेवकांनी प्रशासनाच्या कामकाजावर जोरदार टीका केली. सुमारे चार तासांहून अधिक काळ चाललेल्या चर्चेत अनेक नगरसेवकांनी अधिकारी व ठेकेदारांच्या कामाच्या पद्धतीबाबत नाराजी व्यक्त करत प्रशासनाला धारेवर धरले. सुरेश भोईर यांनी मांडलेल्या प्रस्तावावर चर्चा करताना निखिल बोराडे यांनी धार्मिक स्थळांच्या स्थलांतरावर शुल्क लावू नये आणि स्थानिक शेतकऱ्यांचा विचार करूनच निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. भोईर यांनी प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती करत सप्टेंबर २०२४…

Read More

आंद्रा धरणातून पाणी उचलण्यासाठी आवश्यक जमिनीचे कायमस्वरूपी हस्तांतर करण्याची मागणी पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी आमदार शंकर जगताप यांचा पाठपुरावा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहराची वाढती लोकसंख्या आणि भविष्यातील पाण्याची गरज लक्षात घेता, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या प्रकल्पांना आता वेग आला आहे. आंद्रा धरणातून पाणी उचलण्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे हस्तांतरण आणि रावेत येथील ब्रिटिशकालीन बंधाऱ्याचे आधुनिकीकरण या दोन महत्त्वपूर्ण गोष्टीचा पाठपुरावा आमदार शंकर जगताप यांच्याकडून केला जात आहे. यासंदर्भात भाजपा महायुती सरकार सकारात्मक असून, आंद्रा धरणातून पाणी उचलण्यासाठी आवश्यक जमिनीचे हस्तांतर कायमस्वरूपी करणे आणि रावेतच्या नवीन बंधाऱ्यासाठी 105 कोटी रुपयांची निधी देण्याची मागणी आमदार शंकर जगताप यांनी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित महासभेत नगरसदस्या स्नेहा कलाटे यांनी महापौर रवि लांडगे यांचा शहराचे प्रथम नागरिक या नात्याने विकास आराखडा समितीवर अध्यक्ष म्हणून समावेश करण्याची मागणी केली,महापालिका सभेत आपले मत व्यक्त करताना त्या बोलत होत्या. महापौर रवि लांडगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आतापर्यंत केलेल्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी शहराला अपेक्षित असे कार्यक्षम नेतृत्व मिळाले असल्याचे कलाटे यांनी नमूद केले. शहराच्या विकासाच्या दृष्टीने महापौर लांडगे यांनी विकास आराखडा समितीवर शहराचे प्रथम नागरिक या नात्याने समितीचे अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन करावे, जेणेकरून शहराचा सर्वांगीण विकास अधिक पारदर्शक व प्रभावीपणे साधता येईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर, पण तिथे आपल्या मुलांची सुरक्षा नक्की किती आहे? हा गंभीर प्रश्न उपस्थित करत आमदार अमित गोरखे यांनी राज्याच्या विधिमंडळात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा लावून धरला. शाळांमधील ‘ICC’ आणि ‘POSH’ समित्यांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, या समित्यांचे ‘ऑडिट’ करणे आणि शाळांना त्यांच्या सुरक्षेनुसार ‘रेटिंग’ देणे, यांसारख्या क्रांतिकारी मागण्या आमदार गोरखे यांनी केल्या. आमदार अमित गोरखे यांनी विधान परिषदेत उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेची शासनाने गंभीर दखल घेतली आहे. शाळांमधील सुरक्षा समित्या, स्वसंरक्षण शिक्षण आणि सुरक्षा मानके यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आमदार गोरखे यांनी केलेल्या मागणीला शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आमदार…

Read More

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – औंध येथील जिल्हा एकात्मिक आयुष रुग्णालयाची वाढती गरज लक्षात घेता या रुग्णालयाचे ३० खाटांवरून ५० खाटांपर्यंत उन्नतीकरण करण्यात यावे तसेच रुग्णांसाठी आवश्यक औषधे आणि आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विधान परिषदेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे आमदार उमा खापरे यांनी मांडली. औंध परिसरासह पुणे शहर आणि उपनगरातील नागरिक आयुर्वेद, योग, नैसर्गिक चिकित्सा, युनानी आणि होमिओपॅथी अशा आयुष पद्धतींच्या उपचारांसाठी या रुग्णालयावर अवलंबून आहेत. मात्र रुग्णसंख्या वाढत असताना सध्या उपलब्ध असलेल्या ३० खाटांची क्षमता अपुरी पडत असल्याचे आमदार खापरे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. रुग्णालयात अधिक खाटा उपलब्ध झाल्यास अधिक रुग्णांना उपचार मिळू शकतील तसेच…

Read More