ताज्या घडामोडीपिंपरीशिक्षण

34 वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांच्या शाळेची पुन्हा वाजली घंटा !

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लहानपणी शाळेत जायला कंटाळणारे मुलं आणि मुलीं जेव्हा मोठे होतात आणि संसाराच्या जबाबदाऱ्या स्विकारतात तेव्हा त्यानांच त्यांची ती शाळा हवी हवीशी वाटू लागते, पुन्हा शाळेत जावेसे वाटते, बालपणीच्या मित्र-मैत्रिणी, शिक्षक यांना भेटावेसे वाटते. असाच एक यशस्वी प्रयत्न चिंचवडच्या श्री जैन प्रसारक मंडळाच्या श्रीमती गेंदीबाई ताराचंद चोपडा हायस्कूल च्या 1990 साली दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या शिक्षकांनी केला.

दिनांक 25 फेब्रुवारी 2024 रोजी, सारसबागेतील पेशवे सभागृहा मध्ये या सर्व माजी विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी स्नेह-संमेलन भरविले, आणि सर्वांनी मनमुराद आनंद लुटला. कार्यक्रमाला दूर बाहेर गावाहून आवर्जून उपस्थित राहिलेले शिक्षक श्रीयुत भडके सर वयाच्या ८० व्या वर्षीही आनंदाने सहभागी झाले. माजी प्राचार्य श्रीयुत कांबळे सर यांची वयाची ७५ री म्हणजेच अमृत महोत्सवी अभिष्टचिंतन या माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने साजरे केले, तसेच बाकी शिक्षकवर्ग परांडे बाई, गाडगीळ बाई, नाकाडे सर, सदाफुले सर, खामगळ सर तसेच शिरसाठ सर आवर्जून सहभागी झाले होते.

कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन श्री.व सौ. जिंतूरकर यांनी केले, कार्यक्रमाचे नियोजन श्री.महेंद्र मोटे, सौ.शीतल कांचन, सौ.शीतल परब, श्री. श्री.संदीप सोनवणे, श्री.विजय बेहेरे, व श्री.पवन वैद्य यांनी केले, दूर बाहेर गावाहून आवर्जून उपस्थित राहिलेले श्री.संजय अंबिलपुरे, श्री.अरुण आंग्रे, श्री.संजय वायाळ, सौ.उज्वला पाटणकर व सौ.वसुंधरा चतुर यांचे सर्वांनी विशेष कौतुक केले. तसेच उपस्थित शिक्षकांनी त्यांच्या प्रत्येक माजी विद्यार्थ्यांची आपुलकीने चौकशी करीत त्यांच्या वैयक्तिक, व्यावसायिक आणि सामाजिक यशाबद्दल कौतुक केले.

कार्यक्रमामध्ये विविध मनोरंजनाचे कार्यक्रम जसे की गाणी म्हणणे, नक्कल करणे आणी विनोद सांगणे यामध्ये प्रामुख्याने सौ.अनुराधा बारणे, श्री.सतीश सोनवणे, सौ.अर्चना हजारे, सौ.गीतल गोलांडे, श्री.संजय वऱ्हाडी, श्री.मकरंद कुलकर्णी यांनी सहभाग घेतला. तसेच श्री.पंकज इंगळे, श्री.महेश वसवाड, श्री.उदय बागमार, श्री.गजानन सुतार , श्री.अजय धनावडे, श्री.उमेश कुलकर्णी, श्री.उमेश मधुरे, श्री.युवराज राऊत, सौ.सुरेखा कामथे, सौ . प्रतिभा पाटील, श्री.योगेश सैंदाने आणि सौ.वर्षा मोरे यांनीही कार्यक्रमात सहभागी होऊन आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

यापूर्वी सुद्धा यांच्याच बॅचने श्री.सतीश फटांगरे व स्व. श्री.राजेश ढोकले आणि श्री.विश्राम कुलकर्णी यांच्या पुढाकाराने बरेच स्नेह मेळावे यशस्वीरीत्या आयोजित केले होते. तसेच श्री.महेंद्र मोटे, श्री.सुनिल मारणे, श्री.संदीप बांदेकर, श्री.ज्ञानेश्वर जाधव, सौ.शीतल कांचन आणि सौ.शीतल परब यांच्या पुढाकाराने अनेक सामाजिक उपक्रम जसे की, अनाथ आश्रमाला दिवाळी फराळ वाटप आणि आपल्या शाळेला स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला खाऊ वाटपाचे नियोजन करणे. शाळा सोडून जवळ पास 35 वर्षे झाली तरी सर्व माजी विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग अजूनही तोच जिव्हाळा जोपासून आहेत.

भविष्यातही या शालेय ग्रुप चा अनेक सामाजिक उपक्रम चालू ठेवण्याचा मानस आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button