मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला महत्त्वपूर्ण कलाटी देणारा निर्णय – शिवाजीराव आढळराव पाटील

शिरूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला महत्त्वपूर्ण कलाटी देणारा निर्णय आहे, असे मत महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर येथे व्यक्त केले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरुर लोकसभा मतदार संघ, शिरुर लोकसभा पदाधिकारी बैठक चाकण मधिल ऐश्वर्या आयकाँन, आंबेठान चौक येथे पार पडली. त्या वेळी ते बोलत होते . या वेळी याप्रसंगी आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील, जिल्हाध्यक्ष भाजपा शरद बुट्टे पाटील, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, अध्यक्ष खेड तालुका राकाँपा कैलास सांडभोर, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती खेड कैलास लिंबोरे, अध्यक्ष खेड तालुका भाजप शांताराम शेठ भोसले, अध्यक्ष खेड तालुका राकाँपा युवक काँग्रेस जयसिंग दरेकर, प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चा प्रिया पवार,मनसे नेते राजेंद्र बाबू, वागस्कर सरचिटणीस मनसे ,अजय शिंदे, विद्यानंद मानकर ,शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड नगरसेवक सचिन चिखले ,जिल्हाध्यक्ष पुणे मकरंद पाटील, जिल्हा अध्यक्ष पुणे रामदास दरेकर, खेड तालुका अध्यक्ष संदीप नाना पवार, वाहतूक सेना तालुका अध्यक्ष मनोज पडवळ, तालुका अध्यक्ष जनहित कक्ष विवेक एवढे पाटील, तालुका सचिव खेड गणेश गोंधळ, तालुका सरचिटणीस वाहतूक तृणाल गाडेकर, प्रसिद्धीप्रमुख खेड भरत बच्चे उपाध्यक्ष खेड जनहित कक्ष विवेक वायकर ,उपाध्यक्ष खेड तालुका महेश खलाटे तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, जिथे जिथे जातो लोक मला एवढेच म्हणतात दादा आम्ही चुकलो. कारण विद्यमान खासदारांनी लोकांची काहीच काम केले नाही. पंधरा वर्षात मी केलेली ठळक कामे आहे. सोशल मीडियावर माझा निगेटिव्ह नॅरिटीव्ह तयार करण्यात आला आहे. माझे ड्रीम प्रोजेक्ट आहे. रेल्वे आणि हायवे आपल्या भागात युवकांचे नोकरीचे मुद्दे महत्त्वाचे आहे. हजारो लाखो विद्यार्थी बेरोजगार आहेत. तात्पुरता पदावर घेतात अशा अनेक अडचणीवर मात करायची आहे.
विद्यानंद मानकर म्हणाले, मनसे पदाधिकाऱ्यांनी निर्धार केला आहे. अभिनेत्याच्या तीन तासाचा पिक्चर नाही पाहायचा जीवन भरासाठी जीवन समृद्ध करणाऱ्या लोकप्रिय प्रतिनिधी शिवाजीराव आढाराव पाटील यांना निवडून द्यायचे आहे. महायुतीमध्ये बुस्ट फॅक्टर म्हणून आम्हीही तुमच्या सोबत आहे. त्यामुळे विजय निश्चितच दादांचा होणार असल्याचे सांगितले.









