शाळेच्या गेट-टुगेदरबाबत अनुराधा बारणे यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगात सर्वात श्रेष्ठ आई-वडील असले तरी त्यापेक्षा श्रेष्ठ आपले शिक्षक आई-वडिलांनी आपले संगोपन करून आपल्याला चांगले संस्कार शिक्षण दिले असले तरी त्या शिक्षणाला वळण देणारे आपले गुरु शिक्षक असतात .
शिक्षण घेता घेता त्या शालेय वातावरणात आपल्याला चांगले मित्र-मैत्रिणी भेटतात. आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षा त्यापलीकडचे आपले जिवलग मित्र मैत्रिणी शिक्षण पूर्ण झाल्यावर पुढच्या आयुष्यात पदार्पण करून आपले करिअर पूर्ण करण्याचे प्रयत्न करतात त्यानंतर ते संसारात राहून जातात. आपल्या सगळ्यांचे असेच आहे लग्न झाल्यावर आपण नवीन नात्यात गुंतून जातो त्या नात्यांचा मान सन्मान करून आपण आपले शालेय बालपण हरवून बसतो.
आपले जिवलग मित्र मैत्रिणी आपले शिक्षक यांचा आपल्याला विसर पडतो . गेट-टुगेदर म्हटले की आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद येतो आपल्याला परत आपले शालेय जीवन आठवते. माझा तर आनंद गगनात मावेना. प्रत्येक स्त्रीचे असेच असते. दिवसभर राबा खरकटे काढा.
या सगळ्यातून एक दिवस आपण आपल्या शिक्षकांसाठी जिवलग मित्र मैत्रिणीसाठी काढत असतो. थोडक्यात सांगायचे म्हटले तर आपण सर्वजण निम्म्या टप्प्यावर आलो आहेत वयाची पन्नाशी.
मैत्री हे नाते असे आहे वयाला बंधन नसते आपण आपले मनमोकळेपणाने बोलू शकतो. सगळ्या नात्यांमध्ये एकच नातं श्रेष्ठ असते ते मैत्रीचे.
प्रत्येकाला काय ना काही टेन्शन असते. टेन्शन फ्री राहण्यासाठी आपण सर्वजण वेळात वेळ काढून गेट-टुगेदर करतो. म्हणजेच मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे जुन्या आठवणींना उजाळा देऊन गालातल्या गालात हसणारे ll
आयुष्य हे खूप सुंदर आहे. ह्या आयुष्यात जीवनात आपल्याला जसे आई वडील गुरुशिक्षक मित्र मैत्रिणी भेटतात तसेच पुढच्या सात जन्मात सुद्धा आपल्याला असेच मित्र-मैत्रिणी प्रेमळ शिक्षक मिळू दे.परमेश्वराला आपण विनंती करू परमेश्वरा तुझे खूप खूप आभार मानले.
सौ अनुराधा रामचंद्र बारणे.









