पहेलगाम दहशवादी हल्ल्या प्रकरणी मुस्लिमांचा कॅन्डल मार्च; “पाकिस्तान मुर्दाबाद,दहशतवाद मुर्दाबाद”च्या जोरदार घोषणा

“दहशतवाद संपलाय, तर हल्ले होतायत कसे?”
प्रमोद क्षिरसागर यांचा सवाल
निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यात निष्पाप भारतीय पर्यटकांचा गेलेला बळी हा अत्यंत वेदनादायक आणि संतप्त करणारा आहे. या अमानुष हल्ल्याच्या निषेधार्थ निगडी येथील मुस्लिम समाजाच्या वतीने आणि सर्वधर्मीय नागरिकांच्या सहभागातून कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले. शुक्रवार, दिनांक २५ एप्रिल रोजी रुपीनगर येथील एकता चौकातून सुरू झालेला हा मार्च आझाद चौक (सेक्टर २२) येथे संपन्न झाला. “पाकिस्तान मुर्दाबाद”, “दहशतवाद मुर्दाबाद”, “भारत जिंदाबाद” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
मेणबत्त्या प्रज्वलीत करून नागरिकांनी मृत्यूमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली वाहिली. शांततेचा आणि एकतेचा संदेश देणाऱ्या या मार्चमध्ये नागरिकांचा सहभाग मोठा होता. ‘दहशतवादाला कोणताही धर्म नसतो’ हा ठाम संदेश यावेळी देण्यात आला. मुस्लिम समाजावर अलीकडच्या काळात जाणीवपूर्वक संशय घेण्याची प्रवृत्ती वाढत चालली आहे, त्याला ठाम विरोध करत या कँडल मार्च मधून करण्यात करण्यात आला.
या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रमोद क्षिरसागर यांनी आपल्या श्रध्दांजलीपर भाषणात केंद्र सरकारवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की, “हा हल्ला कोणत्याही धर्मावर नाही, तर संपूर्ण भारत देशावर आहे. आणि जेव्हा देशावर हल्ला होतो, तेव्हा सर्व भारतीयांनी एकत्र उभं राहणं हीच खरी देशभक्ती ठरते.” त्यांनी पुढे सांगितले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी करून दहशतवादाचे कंबरडे मोडल्याचे सांगितले, गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० रद्द करून दहशतवाद गाडल्याचा दावा केला, पण तरीही आज पुन्हा असे हल्ले होत आहेत, मग हे हल्ले नेमके कुठून होत आहेत? आणि सरकार त्यांना थांबवण्यात अपयशी का ठरतंय?”
या कँडल मार्चमध्ये उपस्थित सर्वधर्मीय नागरिक, समाजघटक आणि तरुणांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहून घटनेचा संताप व्यक्त केला.
यावेळी रशीदभाई सिद्दीकी,राजू पोथीवाल,जावेदभाई शिकलगार,मौलाना हाफिज जावेद हमजा,मौलाना हाशिम रजा नूरी,बुद्धभूषण अहिरे,एजाज खान,शमीम शेख,अल्ताफ शेख,मलंग अत्तार,गौतम पटेकर,रशीद अत्तार,सागर सूर्यवंशी, विशाल मांजरे,नियाज खान,अब्दुल्ला मुकरताल,फिरोज शेख,मंथन गायकवाड,समाधान कांबळे,अतिश नागटिळक,संदीप माने,सिद्धार्थ मोरे,समीर मुल्ला,मेहबूब शेख,हनीफ मुल्ला,अमीन शेख, नजीर शेख,जाकीर शेख,चांद मुकरताल,बाबू सिद्धिकी,अशपाक शेख,अरहम खान आदी कार्यकर्ते उपस्थित होते.









