- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गांधीपेठ तालीम मित्रमंडळ ही सामाजिक संस्था सुमारे पस्तीस वर्षांपासून जिजाऊ व्याख्यानमालेचे आयोजन करीत असून व्याख्यानमालेच्या समारोपाच्या दिवशी क्रांतिवीर चापेकर, चिंतामणी आणि जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात येतात. आज गुरुवार, दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे मुख्य विश्वस्त ह. भ. प. भावार्थ देखणे यांना धार्मिक आणि आध्यात्मिक कार्याबद्दल(चिंतामणी पुरस्कार), विद्याकर्म आणि अग्निकर्म तज्ज्ञ डाॅ. चंद्रकुमार देशमुख यांना सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील साहसपूर्व कार्याबद्दल (क्रांतिवीर चापेकर पुरस्कार) आणि सामाजिक कार्यकर्त्या लता टाकळकर यांना (जिजाऊ पुरस्कार) प्रदान करून गौरविण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप राहील, अशी माहिती गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष…
कुलगुरू, धोरणकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञांच्या उपस्थितीत भारतीय विद्यापीठांच्या बदलत्या भूमिकेवर सखोल चर्चा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी, पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात आयोजित ‘भारतीय विद्यापीठ संघाची’ संघाच्या’ (AIU) १०० व्या वार्षिक महासभेच्या आणि कुलगुरूंच्या राष्ट्रीय परिषदेचा दुसरा दिवस अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला. “ज्ञान आणि नाविन्यपूर्ण संशोधनाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताला आकार देणे” या संकल्पनेवर आधारित आजच्या सत्रांमध्ये शाश्वत विकास, उद्योजकता, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्वांटम तंत्रज्ञान आणि भारतीय पारंपरिक ज्ञान या विषयांवर देशभरातील कुलगुरू आणि तज्ज्ञांनी विचार मांडले. डॉ. पी. डी. पाटील, (कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी, पुणे) म्हणाले की, “उच्च शिक्षणाची व्याप्ती आता केवळ ज्ञानदानापुरती मर्यादित राहिलेली नाही.…
महिला संमेलन संपन्न पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘अनिर्बंध वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी घटस्फोट घेणे चुकीचे असून त्यामुळे विवाहसंस्था धोक्यात आलेली आहे!’ असे विचार अखिल भारतीय अधिवक्ता परिषद पुणे जिल्हा अध्यक्ष ॲड. नीलिमा गोखले यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निगडी प्राधिकरण येथे व्यक्त केले. अखिल भारतीय अधिवक्ता परिषद, पुणे जिल्हा व पिंपरी चिंचवड जिल्हा आयोजित अधिवक्ता महिला संमेलनात ‘सद्य:स्थितीतील वाढत्या घटस्फोटांची मीमांसा’ या विषयावर मार्गदर्शन करताना ॲड. नीलिमा गोखले बोलत होत्या. याप्रसंगी उपमहापौर शर्मिला बाबर, ज्येष्ठ समुपदेशक डॉ. शिवलीला पाटील, ॲड मधू हूकमानी, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. सतिश गोरडे, ॲड. अंतरा देशपांडे, अधिवक्ता परिषद महामंत्री ॲड. संतोष गुरव, ॲड. अमेय पिंगळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य स्थापना दिन तसेच मराठी राजभाषा दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांसाठी भव्य सांस्कृतिक मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र कीर्ती सोहळा प्रतिष्ठान आयोजित आणि पद्मभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित व दिग्दर्शित आशिया खंडातील पहिल्या क्रमांकाचे ऐतिहासिक महानाट्य ‘जाणता राजा’ सादर करण्यात येणार आहे. निगडी, सेक्टर २५ येथील मदनलाल धिंग्रा मैदानात ‘जाणता राजा’ हे महानाट्य दि. १ मे २०२६ (शुक्रवार) रोजी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, हे महानाट्य सर्वांसाठी विनामूल्य असून सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक नाट्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर रवि लांडगे यांच्या वतीने करण्यात आले आहे.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महावितरण कंपनीच्या पिंपरी विभागाकडून तातडीच्या दुरुस्ती व देखभाल कामांमुळे उद्या दि. ३० एप्रिल रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ वाजेपर्यंत पिंपरी-चिंचवडमधील विविध भागातील वीज पुरवठा बंद राहणार आहे. यामध्ये वाघेरे फिडर, जाधवकर वस्ती फिडर, पिंपरी फिडर, श्रीनगर फिडर, गणेशम फिडर तसेच मिरास पार्क फिडर परिसरातील अनेक सोसायट्या, रस्ते व व्यापारी भागांचा समावेश आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंता, पिंपरी विभाग यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामधारकांना महानगरपालिका प्रशासनाचा कडक इशारा पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत जगताप डेअरी ते वाकड परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूंना उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर आज सकाळी १० वाजल्यापासून व्यापक कारवाई मोहीम राबविण्यात आली. या कारवाई दरम्यान परिसरातील ६ हजार ९४५ चौ. मी. अतिक्रमण तसेच अनधिकृत बांधकाम असलेल्या ३३ पत्रा शेडवर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने निष्कासनाची धडक कारवाई करण्यात आली. या अनुषंगाने वाकड परिसरातील एकूण १०४ मालमत्तांची यादी तयार करण्यात आली होती. न्यायालयीन स्थगिती (स्टे) तसेच अटींसह स्थगिती (कंडिशनल स्टे) असलेल्या मालमत्ता वगळता उर्वरित सर्व अनधिकृत बांधकामांवर नियमानुसार कारवाई करण्यात आली. आयुक्त डॉ. विजय…
त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर सृष्टी प्रकल्पाचे पिंपरीत भूमिपूजन संपन्न पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर या संघर्ष, त्याग आणि समर्पणाची जिवंत प्रतिमा होत्या. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीच्या महान कार्याला खंबीर साथ दिली. बाबासाहेबांनी देशाला विचार, संविधान आणि स्वाभिमान दिला, पण त्या विचारांना उभं राहण्यासाठी जी शांत, नि:स्वार्थ ताकद लागते, ती रमाईंच्या रूपाने त्यांच्या पाठीशी होती. म्हणूनच पिंपरी येथे उभारण्यात येणारे माता रमाईंचे स्मारक म्हणजे केवळ एक वास्तू नसून त्याग, स्त्रीशक्ती आणि सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासाचे प्रेरणास्थान आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने…
महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात ‘एआययू’च्या १०० व्या वार्षिक महासभा आणि कुलगुरूंची राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन “नवोन्मेष, संशोधन आणि सर्वसमावेशक शिक्षणाच्या माध्यमातूनच आपण ‘विकसित भारत’ घडवू शकतो; असा भारत, जिथे प्रगतीचे फायदे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतील आणि विद्यार्थ्यांनी केवळ ज्ञानी न होता समाजात संधी निर्माण करणारे आणि समस्या सोडवणारे नागरिक बनावे”. : राज्यपाल मा. श्री. जिष्णू देव वर्मा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते आज पिंपरी, पुणे येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठात ‘असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज्’ (AIU) च्या १०० व्या वार्षिक महासभेचे आणि कुलगुरूंच्या राष्ट्रीय परिषदेचे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पुरंदर तालुक्यातील बेलसर गावच्या हद्दीतील चोपनवस्ती येथे वाडा ऍग्रो मशरूम कंपनीत भीषण दुर्घटनेत तीन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना ह्रदयदावक व अत्यंत गंभीर आहे. सदरच्या कंपनीत बंद टाकीची स्वच्छता करण्यासाठी मशरूम कंपनीत बेजबाबदारपणे काम करण्यास लावल्याने सुरक्षिततेची काळजी न घेतल्यानेच तीन निष्पाप कामगारांचा मृत्यू झाला आहे. त्या मृतांच्या वारसांना प्रत्येकी २० लाख रुपये द्या अशी मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी मुख्यमंत्री कामगार मंत्री यांच्याकडे केली आहे. कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बेलसर येथील एरो मशरूम कंपनी आणि व्यवस्थापनाने कामगारांना धोकादायक रित्या कामास लावण्यात आले. दिनांक २६ एप्रिल २०२६ रोजी ३.३० च्या सुमारास…
जिजाऊ व्याख्यानमाला – पुष्प तिसरे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘अवघ्या पन्नास वर्षांची गतिमान कारकीर्द लाभलेले छत्रपती शिवाजीमहाराज हे दूरदृष्टी असलेले कालातीत व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळेच स्वराज्याचे पुढे साम्राज्यात रूपांतर झाले!’ असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक संदीप तापकीर यांनी चापेकर स्मारक उद्यान, चापेकर चौक, चिंचवडगाव येथे (मंगळवार, दिनांक २८) व्यक्त केले. गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आणि अनंत नागरी सहकारी पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत ‘मराठ्यांचा देदीप्यमान पराक्रम : गाथा स्वराज्य ते साम्राज्याची!’ या विषयावरील तिसरे पुष्प गुंफताना संदीप तापकीर बोलत होते. इतिहास अभ्यासक ब. हि. चिंचवडे अध्यक्षस्थानी होते; तसेच नगरसेविका मनीषा चिंचवडे, प्रभाकर महाजन आणि गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष…
