- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटना व महावितरण कार्यालय भोसरीचे कार्यकारी अभियंता देवकर यांचे बरोबर पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरात लघुउद्योजकांना महावितरण विषयी येणाऱ्या समस्यावर चर्चा करण्याकरिता बैठक पार पडली. या बैठकीसाठी संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, खजिनदार संजय ववले, संचालक प्रमोद राणे, सचिन आदक व संघटनेचे सभासद तसेच भोसरी महावितरण कार्यालयाचे SDO माने साहेब, असिस्टट इंजि. मोरे व वैरागर उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिका औद्योगिक परिसरातील एम.आय.डी.सी., भोसरी परिसरातील सर्व ब्लॉक, चिंचवडमधील डी-१, डी–२, डी–३ ब्लॉक, संघवी कंपौंड, परमार कॉम्प्लेक्स, आकुर्डी इंड. इस्टेट, एच. ब्लॉक, एफ २ ब्लॉक, पवना, मोरया कॉम्प्लेक्स, सेक्टर ७ व १०,…
पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला २०४७ मध्ये विकसित भारत करण्याची संकल्पना मांडली आहे. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक कल्पक आणि नाविन्यपूर्ण संकल्पना पुढे येण्याची गरज आहे. त्यासाठीच एलपीजे इनोव्हेशन ऍवॉर्डस् ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या माध्यमातून पिंपरी-चिंचवडमधील विद्यार्थ्यांमध्ये दडलेली कल्पकता आणि नवकल्पना पुढे यावी. याच विद्यार्थ्यांमधून पुढे देशाचे मोठे शास्त्रज्ञ, उद्योजक घडावेत हा उद्देश समोर ठेवून ही स्पर्धा घेण्यात आली. यापुढे दरवर्षी ही स्पर्धा भरवून विद्यार्थ्यांमधील नवकल्पनांना वाव देणार असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी शनिवारी (दि. १६) सांगितले. शंकर जगताप यांच्या संकल्पनेतून लक्ष्मणभाऊ जगताप कला आणि क्रीडा अकादमीच्या वतीने शहरातील शाळा…
– कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी ५० कोटींचे अनुदान पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ऑटो, रिक्षा, टॅक्सी चालकांच्या कल्याणकारी मंडळासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. अखेर त्याला यश आले आहे. राज्य शासनाने दिलेला शब्द पाळला आहे. ऑटो, रिक्षा, टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी ५० कोटींचे अनुदान मंजूर केले आहे. त्यामुळे राज्यभरातल २० लाख ऑटो, रिक्षा, टॅक्सी चालकांचे कल्याण होणार असल्याचे प्रतिपादन ऑटो, टॅक्सी, ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे व महाराष्ट्र रिक्षा पंचायत राष्ट्रीय अध्यक्ष तसेच ऑटो टॅक्सी चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक, बाबा कांबळे यांनी केले. ऑटो, रिक्षा, टॅक्सी चालकांच्या मागण्यांसाठी तसेच रखडलेल्या प्रश्नांना शासनदरबारी मांडण्याचे काम संघटनेच्या…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डायमंड जैन सोशल ग्रुपने आपल्या सभासदांसाठी महाविद्यालयीन जीवनाचा अनुभव घेण्यासाठी बॅक टू कॉलेज या थीमवर “दिल दोस्ती दुनियादारी” हा कार्यक्रम आयोजित केला. हा कार्यक्रम चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयामध्ये मध्ये घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम ठेवण्यात आले होते. सुरुवातीला सर्व सभासदांसाठी बाईक रॅली चे आयोजन केले होते. त्यामध्ये गोग्रास, एज्युकोन ,हरित पर्यावरण आणि प्रदूषण मुक्ती याविषयीची जागृती करण्यात आली. महाविद्यालयात आल्यावर सर्वांचे ओरिएंटेशन अध्यक्ष प्रशांत गांधी आणि कार्यक्रम अधिकारी सुनील शहा, व नीरज शाह यांनी केले. त्यानंतर स्पोर्ट्स इव्हेंट, विविध क्लास ऍक्टिव्हिटीज ज्यामध्ये व्हॅलेंटाईन डे, फ्रेंडशिप डे, एक्झामिनेशन ,डिबेट कॉम्पिटिशन, कॅन्टीन व कॉलेज…
मनसेचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस पिं. चिं. प्रभारी ॲड.गणेश अप्पा सातपुते यांच्या हस्ते उद्घाटन पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पिंपरी चिंचवड शहरात शाखा उद्घाटनाचा धडाका सुरू आहे. शहरामध्ये विविध ठिकाणी शाखांची बांधणी करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने महात्मा फुले नगर,भोसरी एमआयडीसी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. शहरातील शेकडो तरुणांनी मनसेत प्रवेश करत ताकद उभी करण्याचा सपाटा लावल्याने सत्ताधाऱ्यांना धडकी भरली आहे. आगामी निवडणुकांचा मुहूर्त बघता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कंबर कसणे सुरू केले असून निगडी, पिंपरी, काळेवाडी, वाकड पाठोपाठ आत्ता पिंपरी येथे मनसेच्या नवीन शाखेचे उद्घाटन करण्यात आले.पिपरी तील शेकडो युवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मनसेचे…
नवी दिल्ली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाच्या निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची घोषणा शनिवारी केली. लोकसभेच्या आणि सोबत होत असलेल्या चार राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. विशेष म्हणजे या निवडणुकीत उमेदवारांना गुन्हेगारी पार्श्वभूमी लपवता येणार नाही. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना प्रचार काळात तीनवेळा त्यांच्यावरील प्रलंबित गुन्ह्यांची माहिती वृत्तपत्र आणि टीव्ही चॅनलवर प्रसिद्ध करावी लागणार आहे. तर गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना तिकीट का दिले? याचीही माहिती संबंधित पक्षांना प्रसिद्ध करावी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने २०२०ला हे आदेश दिले होते. या आदेशांची लोकसभा निवडणुकीत अंमलबजावणी होण्याची ही पहिलीच वेळ असेल. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर याची संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना प्रचार…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारीसाठी जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे टोल फ्री संपर्क क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून निवडणूक आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तात्काळ सुरू झाली आहे.नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी करावयाच्या असल्यास त्यांनी १८००२३३०१०२ आणि १९५० टोल फ्री क्रमांकावर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. या कक्षाद्वारे तातडीने तक्रारीची दखल घेण्यात येईल. हा कक्ष २४ तास सुरू राहणार असून त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियंत्रण कक्षाला आलेल्या तक्रारीनुसार भरारी पथके आवश्यक कारवाई करतील, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. ००००
नवी दिल्ली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. त्रिसदस्यीय निवडणूक आयोगाने ही माहिती दिली. निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर देशभरात आजपासूनच आचार संहिता लागू झाली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांच्या जोर बैठकांना अधिकच जोर येणार आहे. राजकीय समीकरणांचीही जुळवाजुळव जोरात होणार आहे. त्रिसदस्यीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. कोणत्या…
– भोसरी मतदार संघातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला चालना पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)-पिंपरी-चिंचवड शहराची आगामी ४० वर्षांत होणारी लोकसंख्या वाढ आणि पाण्याची मागणी याचा विचार करुन प्रस्तावित २०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाला चालना देण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आंद्रा व भामा आसखेड प्रकल्पातून २६७ एमएलडी पाणी उपलब्ध करण्यासाठी भाजपा सत्ताकाळात प्रकल्प हाती घेण्यात आले. त्याअंतर्गत चिखली येथे १०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वयीत झाला असून, त्याद्वारे समाविष्ट गावांसह पिंपरी-चिंचवडला पाणीपुरवठा सुरू झाला आहे. आता चिखली येथील प्रस्तावित २०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने कर वसुलीचे 1 हजार कोटींचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. आता नागरिकांना सुट्टीच्या दिवशीही कर भरता यावा, यासाठी 31 मार्चपर्यंत कर संकलन कार्यालये सुरू ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात मालमत्ता धारकांना कर भरण्यासाठी 17 विभागीय कार्यालये आणि ऑनलाइनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत 840 कोटी रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. 1 हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कर संकलन विभागाच्या वतीने थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणे, वर्तमान पत्रात नावे प्रसिद्ध करणे, नळ कनेक्शन खंडित करणे, जप्त मालमत्तांचा लिलाव करणे, यासारख्या…
