ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र

भाजपसोबत गेलेल्यांना माफी नाही – शरद पवारांचा थेट इशारा, अजित पवार गटासोबतच्या युतीच्या चर्चांना पूर्णविराम !”

Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा आपली स्पष्ट आणि तडफदार भूमिका मांडत, भाजपसोबत गेलेल्या नेत्यांविषयी कठोर भूमिका घेतली.
आगामी महापालिका निवडणुकीची पार्श्वभूमी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आज मेळावा संपन्न झाला यावेळी पवार बोलत होते. याप्रसंगी खासदार अमोल कोल्हे, राहुल कलाटे, सुलक्षणा शीलवंत, शहराध्यक्ष तुषार कामठे, सुनील गव्हाणे, रविकांत वर्पे यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
“संधीसाधू आणि सत्तेसाठी भाजपसोबत गेलेल्यांना
सोबत घेऊ शकत नाही,” असा थेट इशारा त्यांनी दिला.त्यांच्या या वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये -शरद पवार गट आणि अजित पवार गट – पुन्हा फूट अधिक गडद झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.गेल्या काही आठवड्यांपासून या दोन्ही गटांमध्ये संभाव्य एकजुटीबाबत चर्चा रंगत होत्या. मात्र पिंपरी-चिंचवडमध्ये मंगळवारी झालेल्या एका कार्यक्रमात शरद पवारांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे म्हणणं योग्य आहे. पण ‘सगळे’ म्हणजे गांधी, नेहरू, फुले,
शाहू, आंबेडकर यांचे विचार मानणारे. भाजपसोबत
गेलेल्यांशी युती काँग्रेस वा राष्ट्रवादीच्या विचारधारेशी सुसंगत नाही.”
आगामी पालिका निवडणुकीसाठी नव्या नेतृत्वाची फळी निर्माण करावी लागणार आहे. या नव्या फळीच्या मार्फत आपल्याला बदल घडवावा लागेल. आज आपल्याला हे चित्र बदलावे लागणार आहे. विकास असा करायचा आहे, ज्यातून भावी पिढीने प्रेरणा घ्यायला हवी. यासाठी संघटन मजबूत करावी लागेल. जे गेले त्यांची चिंता करू नका. मी असे अनेक प्रसंग पाहिले आहेत. माझ्यासोबतच्या अनेक सहकाऱ्यांनी साथ सोडली, पण ज्या-ज्यावेळी असं घडलं, तेव्हा मी चिंताग्रस्त झालो नाही. मला कार्यकर्त्यांनी खंबीर साथ दिली आणि जनतेने पाठिंबा दिला. त्यानंतरही मी सत्तेत आलेलो आहे. त्यामुळे कोण आला, कोण गेला याची चिंता करु नका. लोक शहाणे आहेत, आज ही लोकशाही जनतेच्या शहाणपणाने टिकलेली आहे. ती यापुढं ही टिकून राहणार आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.
पुढे बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना धीर दिला की, “जे गेले त्यांची चिंता नका करू. मी असे प्रसंग अनेकदा पाहिले आहेत. पण प्रत्येक वेळेस कार्यकर्त्यांच्या पाठिंब्यामुळे मी सत्तेत परत आलो. लोकशाही जनतेच्या शहाणपणावर टिकलेली आहे आणि ती टिकून राहिल. “त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीसाठी नव्या नेतृत्वाच्या फळीची गरज व्यक्त करत, “संघटन बळकट करा, आणि असा विकास साधा की भावी पिढीला प्रेरणा मिळेल,” असेही आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button