ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्रमावळ

कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, ५२ जणांना वाचविले, आज पुन्हा रेस्क्यू ऑपरेशन

Spread the love

मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ तालुक्यातील कुंडमळा या पर्यटनस्थळावर इंद्रायणी नदीवरील लोखंडी साकव पूल रविवारी दुपारी साडेतीनच्या दरम्यान अचानक कोसळला. या दुर्घटनेत पुलावरून अनेक पर्यटक नदीत पडले आणि वाहून गेले. चार जणांचे मृतदेह सापडले असून ५२ जणांना वाचवण्यात यश आले आहे. ५१ जण जखमी असून, सहाजणांची प्रकृती गंभीर आहे. युद्धपातळीवर सुरू झालेले मदत व शोधकार्य अंधार झाल्यावर थांबवण्यात आले.

रविवारी सुटीमुळे पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. दुपारी १००-१५० पर्यटक लोखंडी पुलावर उभे राहून नदीतून वाहणारे पाणी बघत होते. त्यांच्या वजनाने अचानक पूल मधोमध तुटून कोसळला. पुलावरील अनेकजण पाण्यात पडले आणि वाहून जाऊ लागले. आरडाओरडा सुरू झाला. काही तरुणांनी वाहून जाणाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच तळेगाव पोलिस, अग्निशामक दलाची पथके, वन्यजीव रक्षक मावळ संस्था व विविध बचाव पथकांनी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. घटनास्थळाजवळ गर्दी झाली होती. सर्वत्र भीतीचे वातावरण होते.

पुलावर वाहन गेल्यानंतर हादरे बसतात.पूल कोसळला तेव्हा पुलाखालीही काहीजण बसले होते. पूल कोसळल्याने त्याखाली काहीजण दबले गेले असण्याची शक्यता आहे. सायंकाळी क्रेन आणून सांगाडा काढण्याचे काम सुरू होते.

दुर्घटनेतील जखमींवर विविध रुग्‍णालयांत उपचार सुरु
या दुर्घटनेत श्रीकांत गरुड, शुमम वाळूंजकर, सुमेर कागवाडे, विजय येनकर, कृष्‍णा गांधी, आर्यन गायसमुद्रे, दिपक विरकर, सिद्धी बोत्रे, ओंकार पेहरे, चंद्रकात चौघुले, सान्वी भाकरे, योगेश भंडारे, संजय घोपे, दिव्या वाघ, बादल सिद्राम, समर्थ सिद्राम, सोलापूरी, शंतनु निगडे, गोपल तीवर, वैशाली उपाध्याय, शिल्पा भंडारे, यास्मिन चौधरी, अशोक भेगडे, सुनिलकुमार, वैभव उपाध्याय, छोटू, अंजूम शहा, अमोल घुले, चित्रलेखा गौर, शामिका माने, अंजूम शहा, अमोल घुले, चित्रलेखा गौर, शामिका माने, ओम पिराजी बडगिरे, हरोजी मोहन आगलावे, इंदौल तावरे, सुरेश पडवळ, मोनाली सुरेश पडवळ, वेदांती पडवळ, विनीत पडवळ, योगेश पडवळ, रोहण शिंदे, प्रथमेश पलालकर, अभिषेक पाटील, शौकत गौर, तेजस देवराय, प्रथमेश देवरे, सौरभ माने, दीपक कांबळे, ओमकार गिरी, आकाश काकडे, साहिल शेटे, सलोनी उपाध्याय, लतिका गौड हे या दुर्घटनेमध्ये जखमी झाले असून या सर्वांवर मायमर हॉस्‍पीटल, अथर्व हॉस्‍पिटल, पवना हॉस्‍पिटल, युनिक हॉस्‍पिटल, या रुग्‍णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.

दरम्‍यान कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे करण्यात येईल. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्चसुद्धा राज्य सरकार करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

सायंकाळी एनडीआरएफचे पथक आल्यानंतर बचावकार्यास गती आली. अपघातातील जखमी आणि मृतदेह नेण्यासाठी १५ रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाल्या. चौकशी समिती स्थापन, कठोर कारवाई करणार या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र समितीची स्थापना करण्याची घोषणा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली. अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button