ताज्या घडामोडीपिंपरी

सततच्या वीजपुरवठयामुळे भोसरीतील उद्योजक झाले हैराण

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील सततच्या खंडित होणाऱ्या विजपुरवठयामुळे उद्योजक अडचणीत सापडले असून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर महावितरणचे अधिक्षक अभियंता  सिंहाजीराव गायकवाड साहेब यांच्या उपस्थितीत एक महत्वपूर्ण बैठक भोसरी महावितरण कार्यालय येथे घेण्यात आली.

    या बैठकीस महावितरणचे कार्यकारी अभियंता  देवकर साहेब, उपकार्यकरी अभियंता माने, भगत, सहाय्यक अभियंता झोपे, पलके, आकुर्डी विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता जाधव, सहाय्यक अभियंता देशपांडे मॅडम, दिवटे तसेच प्राधिकरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता सरोदे  सहाय्यक अभियंता बनसोडे तसेच उद्योग क्षेत्रातून पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे संचालक प्रमोद राणे, उद्योजक संदीप सावंत, नाईक, सिरसाट, अकोलकर, अभिजीत शितोळे, साहू, कौस्तुभ मारूडवार, बिरादार यांच्यासह अनेक उद्योजक सहभागी झाले होते.

    सदर बैठकीत उद्योजकांनी सध्याच्या भीषण परिस्थितीचा पाढा वाचला. वीजपुरवठा सतत खंडित झाल्यामुळे उत्पादनाचे तास घसरले आहेत. त्यामुळे अनेकांना कोट्यावधी रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. काही उद्योजकांचे मशिनरीज व उपकरणे नादुरुस्त झाली आहेत. फरनेसमध्ये तयार होणारे साहित्य अर्धवट टप्प्यावर खराब होत आहे. काहीना ग्राहकांकडून थेट ऑर्डर रद्द झाल्याच्या घटना घडल्या आहेत. विजपुरवठयावरील अविश्वासामुळे निर्यातदार उद्योगांनाही मोठा फटका बसत असल्याचे उद्योजकांनी स्पष्ट केले.

   या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी अधिक्षक अभियंता गायकवाड यांनी फिडरनिहाय वीज व्यत्ययांचा आढावा घेण्याचे आदेश दिले असून, उद्योजकांच्या तक्रारीवर तात्काळ कारवाईचे आश्वासन दिले. मुख्य अभियंता काकडे हे दररोज महावितरण ग्रुप वरील तक्रारीचे परीक्षण करत असून हलगर्जीपणा झाल्यास कठोर कारवाई केली जाईल असेही अधिक्षक अभियंता सिंहाजी गायकवाड यांनी सांगितले.

   प्रत्येक औद्योगिक ब्लॉक मध्ये स्विचिंग स्टेशनसाठी आवश्यक जागा MIDC, PMRDA आणि महानगरपालिकेकडून घेण्यात येईल. तसेच भोसरी विभागासाठी ट्रान्सफॉर्मर, फॉल्ट फाईडिंग वाहन, जॉइंटर्स, फिडर पिलर मधील पार्टस, वीज वाहक तारा, फ्यूज वायर, विविध साईजेसच्या केबल्स आणि देखभाल साहित्य पुरवले जाईल, असे आश्वासन बैठकीत देण्यात आले.

   तथापि ही बैठक केवळ आश्वासनापुरती  मर्यादित राहिली असून ठोस कृती अद्याप अपेक्षित आहे. असा सुर उद्योजकांमधून आहे. मागील अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या वीज समस्येचा कायम स्वरूपी निपटारा झालेला नाही, त्यामुळे अनेक लघुउद्योजकांची झोप उडण्याची वेळ येऊ शकते. अशी प्रतिक्रिया उद्योजकांतून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button