ताज्या घडामोडीपिंपरी

संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी शिक्षकाची भूमिका महत्त्वाची – डॉ अशोककुमार पगारिया 

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आजच्या विज्ञान तंत्रज्ञान व भौतिक व्यवस्थेच्या जाळ्यामध्ये संस्कार पासून दुरावत चाललेल्या समाजाला संस्कारक्षम करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी शिक्षकाची आहे असे प्रतिपादन डॉ .अशोककुमार पगारिया यांनी व्यक्त केले.

भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीच्या प्रीतम प्रकाश महाविद्यालयात विद्यार्थी विकास मंडळ आणि राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ अशोककुमार पगारिया पुढे म्हणाले की , समर्पण, श्रद्धा, सखोल ज्ञान, अनुशासन आणि चारित्र्य ही शिक्षकी पेशाची पंचसूत्री आहे.

आजच्या प्रगत वैज्ञानिक काळात अनुभवाचे बोलच महत्त्वाचे ठरतात अनुभव आपल्याला शिक्षकच देतात .त्या अनुभवाच्या आधारे सक्षम पिढी तयार होते.हीच सक्षम पिढी समाजाचे भावी नेतृत्व करते हे नेतृत्व करण्याची भूमिका विद्यार्थ्यात निर्माण व्हावी असा आशावाद डॉ. अशोककुमार पगारिया यांनी व्यक्त केला.

याप्रसंगी व्यासपीठावर‌ महाविदयालयाचे प्राचार्य  प्रा. सदाशिव कांबळे,विद्यार्थी विकास मंडळाचे प्रमुख डॉ. स्वाती वाघ, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रमुख प्रा. सचिन पवार, उपस्थित होते.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका मोठ्या जबाबदारीने पार पाडली. विद्यार्थी झालेल्या शिक्षकांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.सचिन पवार यांनी केले, तर प्रमाणपत्राचे वाचन डॉ.स्वाती वाघ यांनी केले. कार्यक्रमाचे आभार कु. पूर्वा बरगड या विद्यार्थ्यांनीने मानले. या कार्यक्रमाला प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button