ताज्या घडामोडीपिंपरी

आकुर्डीत ‘वारकरी भवन’ उभारा – माजी उपमहापौर शैलजा मोरे व जयंत आप्पा बागल

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये याकरिता आकुर्डीतील पांडुरंग काळभोर सभागृह येथे ‘वारकरी भवन’ उभारण्यात यावे, अशी मागणी माजी उपमहापौर शैलजा मोरे यांनी समस्त वारकऱ्यांच्या वतीने महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेऊन त्यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी त्यांच्यासमवेत महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे सचिव जयंत आप्पा बागल, हभप अनिकेत मोरे इनामदार, हभप जगन्नाथ नाटक पाटील, मा. नगरसेवक सुरेश भोईर, हभप दत्तात्रय साकोरे, हभप कैलास कातळे, किशोर पाटील, हभप जयवंतराव शिंदे, हभप खंडू मोरे, अरुण गोंटे, किशोर पवार, संदीप भालके, किरण दळवी, हभप विनायक महाराज जगताप, राम साखरे, अभिजित वाघेरे, नरेश गुलानी, इंद्रजित पाटोळे, संदेश गोलांडे आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, श्री क्षेत्र देहू येथून प्रस्थान ठेवत श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी हजारो वारकर्‍यांसह पिंपरी चिंचवड शहरात दाखल होते. या पालखीचा मुक्काम आकुर्डीतील विठ्ठल रुक्मिणी मंदीरात असतो. वर्षानुवर्षे परंपरागत हा पालखी सोहळा होत असताना पिंपरी चिंचवड शहराला वारक-यांची सेवा करण्याची संधी मिळते. त्यामुळे मुक्कामासाठी मोठ्या संख्येने येथे वारकरी येत असतात. जागेची कमतरता असल्याने वारकऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांच्यासाठी आकुर्डीतील प्रभाग क्रमांक १५ येथील पांडुरंग काळभोर सभागृह येथे सुसज्ज अशा ‘वारकरी भवन’ची उभारणी करावी. त्यामध्ये वारकऱ्यांसाठी सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात, ज्यामुळे मुक्कामादरम्यान वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही, असे या निवेदनात माजी उपमहापौर मोरे ,आप्पा बागल व वारकरी बधुंनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button