- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी चौकात अहिल्यादेवी पुतळ्यासमोर बसविण्यात आलेला अशास्त्रीय आणि अपघातजन्य काँक्रिट डिव्हायडर तात्काळ हटवावा, या मागणीसाठी आज रिक्षा-टॅक्सी चालकांनी मनपा मुख्यालयासमोर मोठे एल्गार आंदोलन केले. हे आंदोलन महाराष्ट्र रिक्षा पंचायत कष्टकरी जनता आघाडी आणि ऑटो टॅक्सी ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झाले. आंदोलनादरम्यान आंदोलकांनी “भ्रष्टाचार बंद करा”, “डिव्हायडर हटवा”, “वाहतूक कोंडी थांबवा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी डॉ. कांबळे यांनी मनपा आयुक्तांना संबोधित सात मागण्यांचे निवेदन सादर केले. मनपाचे अधिकारी अभिमन्यू भोसले यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले व डिव्हायडरबाबत तातडीने कार्यवाहीचे आश्वासन दिले. डॉ. कांबळे यांनी प्रशासनावर आर्थिक गैरव्यवहार…
एमआयटी एडीटी विद्यापीठातर्फे करिअर गाईडन्स सेमिनार निगडीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात “बारावी नंतर पुढे काय?” या विषयावर मार्गदर्शन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बारावीची परीक्षा संपल्यानंतर “पुढे काय करावे?” हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांसमोर नेहमीच उभा राहतो. विद्यार्थ्यांनी आपल्या आवड, क्षमता आणि संधी लक्षात घेऊन योग्य करिअर निवडणे ही जबाबदारीची वेळ असते. या निवड प्रक्रियेत पालकांचे मार्गदर्शन आणि समजूतदारपणा महत्त्वाचा ठरतो. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळावी आणि पालकांना निर्णय घेण्यास मदत व्हावी यासाठी एमआयटी एडीटी विद्यापीठ, पुणे आणि ॲडमिशन सजेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “बारावी नंतर पुढे काय?” या विषयावर मोफत करिअर गाईडन्स सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. हा सेमिनार…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही देशप्रेमाने भारावून कार्यरत असलेल्या सर्व सेवाभावी संस्थांची मातृसंस्था आहे!’ असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषद केंद्रीय सह मंत्री तथा अखिल भारतीय सह सत्संग प्रमुख महेंद्र तथा दादा वेदक यांनी पांजरपोळ, भोसरी येथे (रविवार, दिनांक ०९ नोव्हेंबर २०२५) व्यक्त केले. पुणे ग्रामीण विभागातील विश्व हिंदू परिषदेच्या चार जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी वर्गातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दादा वेदक बोलत होते. याप्रसंगी विश्व हिंदू परिषद महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण, प्रांत सहमंत्री आणि ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. सतिश गोरडे, प्रांत सहमंत्री नितीन वाटकर, विभाग मंत्री सोमनाथ दाभाडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. दादा वेदक पुढे म्हणाले…
महिलांच्या विश्वासातून नेतृत्व मजबूत; पुनावळे-ताथवडे-वाकडमध्ये राहुल काटेंचा प्रभाव वाढतोय पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुनावळे,ताथवडे, वाकड परिसरात भाजपाचे कार्यकर्ते राहुल काटे यांच्या पुढाकाराने ‘उत्सव आनंदाचा – खेळ पैठणीचा!’ या उपक्रमास महिलांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. महिला मतदारांशी थेट संवाद साधत, महिलांच्या कलेला व्यासपीठ देणारा हा कार्यक्रम आगामी निवडणुका लक्षात घेऊन महत्त्वाचा ठरत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. कार्यक्रमाला परिसरातील महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दिसली. मंचावरून महिलांच्या सशक्तीकरणाचा संदेश देत कार्यक्रमाचे रूपांतर सामाजिक-जागृती व जनसंपर्क मोहिमेत करण्यात आले असल्याचे स्पष्टपणे दिसून आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बाप्पू) काटे यांनी विजेत्या महिलांचा सन्मान केला. तर अभिनेत्री पल्लवी वैद्य यांनी उपस्थिती…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने नागरिकांना ओला व सुका कचरा स्वतंत्र देण्याचे आवाहन केले आहे. शहरातील अनेक नागरिक कचरा वर्गीकरणाचे नियम पाळत असले तरी काही भागांमध्ये अद्याप ओला व सुका कचरा एकत्र दिला जातो, असे प्रशासनाचे निरीक्षण आहे. महापालिकेने दोन वेगवेगळ्या रंगांचे डबे उपलब्ध करून दिले असून, त्यांच्या योग्य वापराने कचऱ्याचे प्रभावी वर्गीकरण, पुनर्वापर आणि कंपोस्टिंग सुलभ होईल. घनकचरा व्यवस्थापन अधिनियमानुसार प्रत्येक नागरिकाने घरगुती तसेच व्यावसायिक कचरा वर्गीकृत स्वरूपात देणे बंधनकारक आहे. स्वच्छतेसाठी नियुक्त निरीक्षण पथके रोज तपासणी करत असून, नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे..“शहर स्वच्छ ठेवणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,” असे…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विद्यार्थी हा आत्मनिर्भर आणि विकसित भारताचा प्रमुख कणा आहे. त्यांना पूर्वीच्या गुरुकुल पद्धतीतील सर्वांगिण दृष्टीकोन विकसित करणारे, समाजाप्रती संवेदनशील बनविणारे, मानसिक व शारीरिक आरोग्य अबाधित राखत कायम सकारात्मक दृष्टीकोन देणारे, पुस्तकाबाहेरील शिक्षण द्यायला हवे. कारण, विद्येचे अंतिम उद्दिष्ट केवळ पदवी मिळवणे नव्हे; मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या उन्नतीसाठी करणे, स्वतःला देशाच्या प्रगतीसाठी समर्पित करणे — हेच खऱ्या शिक्षणाचे यश आहे. अपयश हे शेवट नसते, तर नव्या प्रवासाची सुरुवात असते. त्यामुळे, अपयशाला यशाची शिडी बनवून तुमच्या ज्ञान, कर्तृत्व आणि संवेदनशीलतेच्या बळावर भारताला जागतिक महासत्ता बनवा, असे आवाहन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले. ते येथे आयोजित…
विश्वास पाटील यांना यशवंतराव चव्हाण प्रज्ञावंत साहित्य पुरस्कार तसेच इतरांना भूमिपुत्र पुरस्कार जाहीर पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – इंद्रायणी साहित्य परिषदेच्या वतीने चौथे साहित्य संमेलन मोशी येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर साहित्य नगरी (जय गणेश बँक्वेट हॉल) बीआरटी रोड, मोशी येथे रविवार, दि. २३ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. याचे उद्घाटन सकाळी ९ वाजता, ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षण तज्ञ न. म. जोशी यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटन सत्रात ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांना यशवंतराव चव्हाण प्रज्ञावंत साहित्य पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष संदीप भानुदास तापकीर यांनी पत्रकार परिषदेत दिली. चिंचवड…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची जाणीव, संवेदनशीलता आणि मानवतावादी दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या सर्व शैक्षणिक शाखांमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. त्या अंतर्गत रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) अॅप्लाइड सायन्स अँड ह्युमॅनिटीज विभाग तसेच एफइएसए आणि लाइफ स्किल्स सेल विभागातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी पीसीसीओईआर डॉ. हरीश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली ताथवडे मधील निधी प्रेरणा भवन अनाथ आश्रम येथे दीपोत्सव साजरा केला. यावेळी विभागप्रमुख प्रा. शीतल पाटील, कार्यक्रम समन्वयक प्रा. प्रिया ओघे, प्रा. निलेश ठुबे, विद्यार्थी प्रतिनिधी पार्थ निकुंभ, अर्थव देशमुख, राजवर्धन शितोळे, वेदका…
पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे गुरव ते वायसीएम रुग्णालय, डी. वाय. पाटील कॉलेज, नेहरूनगर व मासुळकर कॉलनी या वर्दळीच्या मार्गांवर प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन बस थांबे समाविष्ट करावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अरुण पवार यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे निवेदनाद्वारे केली आहे. या संदर्भा अरुण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मराठवाडा जनविकास संघाचे सदस्य श्रीकृष्ण जाधवर व मालोजी भालके यांनी पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक पंकज देवरे यांना निवेदन दिले. त्यांनी पीएमपीएमएलचे अधिकारी सतीश गव्हाने यांना याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या. अरुण पवार यांनी निवेदनात म्हटले आहे, की पिंपळे गुरव परिसरातील नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी, तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वायसीएम…
झोपडपट्टीतील कार्यकर्त्याच्या घरी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील; पिंपरी चिंचवडच्या राजकारणात ‘जनसंपर्काचा नवा अध्याय’ पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी पिंपरी चिंचवड शहरात दौरा करीत नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या. भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या नियोजनानुसार झालेल्या या दौऱ्यात पिंपरी आणि चिंचवड विधानसभा क्षेत्रातील विविध भागांना भेट देण्यात आली. लवकरच भोसरी विधानसभा भेटीचे आयोजन करण्यात येणार आहे. दौऱ्यादरम्यान झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, स्वच्छता व्यवस्था आणि आरोग्य विभागातील तक्रारी यांसह नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवर सविस्तर…
