
पालखी सोहळ्याचे आळंदीत जोरदार स्वागत
आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आषाढी पायी वारी सोहळ्या अंतर्गत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वैभवी पादुका पालखी सोहळ्याचे परंपरेने माऊली मंदिरात हरिनाम गजरात आगमन झाले. हजारो वारकरी भाविकांचे उपस्थितीत सोहळा हरिनाम गजरात आळंदीत परतला. यावर्षी लाखो भाविकांचे उपस्थितीत पायी वारी सोहळा राज्यात साजरा करण्यात आला. पंढरीत श्रीविठ्ठल देव भेट , गोपाळपुर काला उरकून श्रींचे वैभवी पादुका पालखी सोहळ्याचे हजारो भाविक, वारकरी, नागरिकांच्या उपस्थितीत हरीनाम जयघोषात सोहळा शनिवारी ( दि. 8 ) अलंकापुरीत पोहचला. परंपरेने रविवारी( दि. 9 ) आळंदीत कामिका एकादशी सोहळा हरिनाम गजरात साजरा होत आहे.
ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांचे परंपरेने आळंदी मंदिरात पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, ऋषिकेश आरफळकर यांचे प्रमुख उपस्थितीत श्रींचे पादुका आळंदी देवस्थानकडे वारीहून आल्यानंतर परंपरेने सुपूर्द करण्यात आल्या. श्रींचे पादुका पालखी मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर विना मंडपातून माऊलींचे मंदिरात सोहळा आरतीने विसावला. तत्पूर्वी माऊली मंदिरातून श्रींचे स्वागत प्रथा परंपरेने दिंडी हरिनाम गजरात पालखी सोहळ्यास सामोरी जात महानैवेद्य झाला. अभंग गात हरिनाम गजरात सोहळ्याचे स्वागत व आगमन झाले.
सोहळा आळंदीत प्रवेश प्रसंगी पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, राजेंद्र आरफळकर, ऋषिकेश आरफळकर, आळंदी देवस्थानचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख राजेंद्र उमाप, प्रमुख विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजन नाथ, चैतन्य महाराज लोंढे कबीरबुवा, पुरुषोत्तम महाराज पाटील, वेदमूर्ती अवधूत महाराज चक्रांकित, हंसराज चक्रांकित, व्यवस्थापक माऊली वीर, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपाध्यक्ष सुजाता तापकीर, माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील, मानकरी माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील, योगीराज कु-हाडे, योगेश आरु, ज्ञानेश्वर दिघे, विठ्ठल घुंडरे, श्रींचे सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे, राजाभाऊ रंधवे चोपदार, उद्धव रणदिवे चोपदार, ज्ञानेश्वर गुळुंजकर,संजय रणदिवे, तुकाराम माने, भीमराव घुंडरे,ज्ञानेश्वर घुंडरे, नगारखाना सेवक मानकरी बाळासाहेब भोसले, सचिन घुंडरे, विवेक घुंडरे, विनायक घुंडरे, सचिन कुऱ्हाडे, महादेव रत्नपारखी, अप्पाबुवा महाराज पाटील यांचे सह मानकरी, दिंडीकरी, वारकरी भाविक उपस्थित होते.
आळंदी मंदिरात ज्ञानेश्वर महाराज यांचे वैभवी पादुका आल्यानंतर श्रींचे संजीवन समाधी मंदिरात आरती झाली. आळंदीत पालखी सोहळ्याचे स्वागतास भाविकांनी रस्त्याचे कडेला दुतर्फा उभे राहून गर्दी करीत हरिनाम जयघोषात स्वागत केले. यावर्षी पालखी सोहळ्यावर कोणतेही निर्बंध नसल्याने सोहळा मोठ्या आनंदी उत्साही मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला.
आळंदीत श्रींचे सोहळ्याचे जोरदार स्वागत करण्यात आले. रांगोळ्यांचे पायघड्या, पुष्पसजावट करण्यात आली. ठिकठिकाणी माऊली भक्त मंडळांनी श्रींचे पालखीवर पुष्प वर्षाव करीत स्वागत केले. भाविकांना विविध ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. आळंदीतील प्रथा परंपरांचे पालन करीत श्री नरसिव्ह सरस्वती स्वामी महाराज यांचे मूळपीठ येथे ह.भ.प. अवधूत महाराज चक्रांकित आणि परिवाराचे वतीने पिठलं भाकरी चा महाप्रसाद परंपरेने वाटप करण्यात आला. येथे भव्य स्वागत, पुष्पवृष्टी, महाप्रसाद वाटप, विद्युत रोषणाई लक्षवेधी करण्यात आली. भाविकांनी मोठी परंपरा जोपासत महाप्रसादास गर्दी केली. अनेक दिवसांचे विरहा नंतर श्रींचे पालखी सोहळा आळंदीत येताच येथे नवचैतन्य अवतरले. मोठ्या ज्ञानभक्तीमय वातावरणात आळंदीकरांचे वतीने सोहळ्याचे स्वागत आळंदी देवस्थान व ग्रामस्थांचे वतीने करण्यात आले. व्यवस्थापक माऊली वीर, आळंदी नगरपरिषद मुख्याधिकारी माधव खांडेकर, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे विश्वस्त प्रकाश काळे, अध्यक्ष सुरेश वडगावकर, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, आजी, माजी पदाधिकारी, विविध सेवाभावी संस्था, संघटना यांचे वतीने करण्यात आले.
यावेळी वारकरी शिक्षण संस्थेच्या शालेय मुलांनी रस्त्याचे दुतर्फा उभे राहून तसेच सोहळ्यात धाकट्या पादुका ते आळंदी असा प्रवास करीत सोहळ्याचे हरिनाम गजरात स्वागत केले. या पालखी सोहळ्यात सर्व प्रकारच्या सेवा सुव्यवस्थित आणि सुसज्ज व्यवस्था, भोजन व्यवस्था, पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात देत सोहळ्याचे चोख नियोजन झाल्याने कोणीही आजारी पडले नाही. उत्साही आनंदात पायी वारी करीत सोहळा आळंदीत आल्याचे उपव्यवस्थापक तुकाराम माने यांनी सांगितले.
थोरल्या पादुका मंदिरात पालखी सोहळ्याचे स्वागत आरती आषाढी पायी वारी सोहळ्या अंतर्गत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या वैभवी पादुका पालखी सोहळ्याचे परंपरेने श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्ट च्या वतीने मंदिरात हरिनाम गजरात स्वागत करण्यात आले. हजारो वारकरी भाविकांचे उपस्थितीत सोहळाचे स्वागत ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष विष्णू तापकीर यांनी केले.
यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पदाधिकारी उपस्थित होते. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान प्रमुख विश्वस्त डॉ भावार्थ देखणे, पालखी सोहळ्याचे मालक राजेंद्र आरफळकर, राजाभाऊ चोपदार, बाळासाहेब चोपदार , राजाभाऊ चौधरी यांचा संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका मंदिर ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अँड विष्णू तापकीर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, उपरणे देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी ट्रस्टचे खजिनदार दत्तात्रय गायकवाड, ह भ प रमेश महाराज घोंगडे आदी मान्यवर उपस्थित होते. आळंदी व दिघी पोलीस स्टेशनचे वतीने प्रभावी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परिसरातील भाविक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी करून दर्शन घेतले. मंदिर समितीचे वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत सुशोभित रांगोळीच्या पायघड्या टाकीत लक्ष वेधले. मंदिरात लक्षवेधी रंगावली व पुष्प सजावट करण्यात आली होती.
आळंदी पंढरपूर आनंद वारीत स्वच्छतेचीही वारी करण्यात आली. पंढरपूर वारीमध्ये स्वच्छता अभियानाचा उपक्रम राबविण्यात आला. एक तरी ओवी अनुभवावी याप्रमाणे आयुष्यात एक तरी वारी अनुभवावी. वारीच्या अप्रतिम अनुभूतीची संधी यावर्षी प्रत्यक्षात अनुभवली. त्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जाणवतच होता. एवढ्या मोठ्या विशाल वारीमध्ये आपलं काहीतरी योगदान लाभलं या समाधानाने सर्व सेवक तृप्त झाले होते. स्वच्छता वारीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी असणाऱ्या सर्व सेवक पदाधिकाऱ्यांचे दिलीप महाराज ठाकरे यांनी आभार व्यक्त केले. या पुढील स्वच्छता मोहीम अधिक मोठ्या प्रमाणात पदाधिकारी साधक, सेवक यांचे उपस्थितीत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आळंदी नगरपरिषद, आळंदी देवस्थान, आवेकर भावे रामचंद्र संस्थान ( श्री राम मंदिर ), लक्ष्मी नारायण श्री विष्णू मंदिर, श्री हरिहरेंद्र महाराज, सद्गुरू श्री साखरे महाराज मठ श्री दत्त मंदिर आदींसह आळंदीतील विविध सेवाभावी संस्था, मंडळे यांचे वतीने श्रींचे वैभवी पालखी सोहळ्याचे वारकरी संप्रदायातील प्रथा परंपरेने स्वागत करण्यात आले. या वेळी मानकरी यांना नारळ प्रसाद देऊन सन्मान करण्यात आला.
श्रींचे सोहळ्याचे अलंकापुरीत आगमन होताच येथील माऊली अन्न छत्र मंडळ, आळंदी यांचे तर्फे वारकरी, भाविक, माऊली भक्त यांना माऊलींची पालखी आळंदीत आल्याने महाप्रसाद वाटप करण्यात आले. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील अन्नप्रसाद वाटप करण्यात आले. या महाप्रसादात भिठलं, भाकरी, शिरा, मसाला भात वाटप करून सेवाभाव आणि परंपरेचे संवर्धन करीत माऊलीचा प्रसाद हरिनाम गजरात वाटप करण्यात आहे.
श्रींचा सोहळा आळंदीत विसावल्या नंतर लहान, थोर भाविक भक्त , वारकरी, नागरिकांना परंपरेने पिठलं भाकरी महाप्रसाद अवधूत चक्रांकित महाराज यांचे सह माउली अन्न छत्र मंडळ आळंदी यांचे तर्फे या ही वर्षी सेवा माऊलींचे चरणी रुजू करण्यात आली. सेवेचे हे ३५ वे वर्ष पूर्ण झाले आहे. सेवाभाव जपत सर्व मंडळाचे सदस्य, पदाधिकारी यांनी सन १९९१ पासून आज पर्यंत सेवा रुजू केली. असे माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार कुऱ्हाडे पाटील यांनी सांगितले. तसेच महाद्वार प्रांगणात व्यापारी तरुण मंडळा तर्फे देखील महाप्रसाद वाटप करण्यात आला. आळंदी नगरपरिषद तर्फे श्रींचे पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. या वर्षी नगरपरिषदेने दगडी पुलाचे सुरुवातीस नादब्रम्ह शिल्प विकसित केले आहे. या शिल्पाचे समस्त वारकरी संप्रदायाचे उपस्थितीत उदघाटन हरिनाम गजरात करण्यात आले. या प्रसंगी मुख्याधिकारी माधव खांडेकर, नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, उपाध्यक्षा सुजाता तापकीर, गटनेते सचिन गिलबिले यांचे सह पदाधिकारी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
येथील आवेकर भावे रामचंद्र संस्थान श्री राम मंदिरात माऊलींचे पालखीचे स्वागत करण्यात आले. या वेळी परंपरेने श्रींची आरती झाली. मानकरी यांना नारळ प्रसाद देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी श्रींचे चोपदार राजाभाऊ रंधवे, बाळासाहेब रणदिवे, योगेश सुरू, बाळासाहेब कुऱ्हाडे, मालक ऋषिकेश आरफळकर, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पाटील आदींचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी आवेकर भावे रामचंद्र संस्थानचे विश्वस्त चिन्मय चौभे, लक्ष्मीकांत दंडनाईक, अर्जुन मेदनकर, अविनाश गुळुंजकर, माजी विश्वस्त बिपीन चौभे, नरहरी महाराज चौधरी, लक्ष्मण मेदनकर, अप्पाबुवा पाटील महाराज, महेश अयाचित गुरुजी मारुती वाघमारे, संकेत वाघमारे आदी उपस्थित होते. हरिनाम गजरात श्रींचे पालखी सोहळयाचे स्वागत करण्यात आले.
