Spread the love

 

चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गुरुभक्तीतून यशस्वीतेचे द्वार उपलब्ध होते .गुरु आनंद भविष चे स्वप्न पहात. त्यातूनच अनेक संस्था ची आचार्य सम्राट आनंद ऋषीजी महाराजांनी उभारणी केली केली .कुठलेही दोष आपल्यामध्ये येऊ नये यासाठी जागा ठेवू नये. भगवान मिळणे सोपा आहे परंतु गुरुभक्ती टिकून ठेवणे अवघड आहे .गुरु शिवाय आपले अस्तित्वच नसते ,असे मत उपाध्याय प्रवर अर्हम विजा प्रणेता प्रवीण ऋषीजी महाराज यांनी चिंचवड येथील होली चातुर्मास निमित्त आयोजित आचार्य सम्राट आनंद ऋषीजी यांच्या 32 व्या पुण्यतिथीआयोजित प्रवचनात व्यक्त केले .

यावेळी मधुर कंठी तीर्थेश ऋषीजी महाराज जैन साध्वी पिंपरी चिंचवड सकल जैन संघाचे पदाधिकारी विविध जैन श्रावक संघाचे अध्यक्ष विशाल जनसमुदाय उपस्थित होता.

यावेळी बीइंग अर्हम पाठशाल या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली, या उपक्रमातून गावोगावी पाठशाळा व उभारणी करून संस्कारांची पायाभरणी केली जाणार आहे. गुरु आनंद यांना प्रिय असणाऱ्या आयमबील तप आराधना मोठ्या भक्ती भावाने सामुदायिक आयोजन करण्यात आले, तपस्वींच्या गौतम प्रसादी लाभ धर्मप्रेमी सु श्रावक खिवराजजी मुथा परिवाराच्या वतीने घेतला गुरुदेव श्री महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निगडी येथील ग दि माडगूळकर सभागृहामध्ये 72 तास अष्टमंगल ध्यान शिबिराचे आयोजन दिनांक 31 मार्च ते 3 एप्रिल या कालावधीत होणार आहे होली चातुर्मास कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जैन श्रावक संघ चिंचवड व चिंचवड स्टेशन संघ ,पिंपरी चिंचवड सकल जैन ,महिला मंडळ आदींनी प्रयत्न केले

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version