Spread the love

पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवाजी महाराजांच प्रशासन प्रगतीशील धोरणे आणि कार्यक्षम वैशिष्ट्यीकृत होतं. किनारपट्टीच्या रक्षणासाठी नौदलाच्या वर्चस्वाचे महत्त्व ओळखून त्यांनी एक मजबूत नौदल दल स्थापन केले. त्यांच्या प्रशासकीय सुधारणांमध्ये शिस्तबद्ध लष्करी रचना निर्माण करणे, महसूल सुधारणांचा परिचय आणि व्यापाराला चालना देणे यांचा समावेश होता. त्यांनी धार्मिक सहिष्णुतेवरही भर दिला आणि विविध समाजाचे समर्थन केले, ज्यामुळे त्यांच्या सर्व प्रजेला न्याय मिळाला. त्यांनी गनिमी युद्धाच्या युक्त्यांचा वापर करून अनेक किल्ले आणि प्रदेश सामरिकदृष्ट्या ताब्यात घेतले आणि ते त्यांचे ते ट्रेडमार्क बनले. जिजाबाईंनी त्यांच्यात लहानपणापासूनच मातृभूमी आणि लोकांबद्दल अभिमान आणि जबाबदारीची भावना निर्माण केली होती. त्यामुळेच ते आज रयतेचे लोकप्रिय राजे बनू शकले. शिवाजी महाराजांच शौर्य, स्वराज्य स्थापनेसाठीचे त्यांचे प्रयत्न व आदर्श नेतृत्व यापासून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी आणि राष्ट्रप्रेम जोपासावं, असं प्रतिपादन संदीपशेठ काटे यांनी केलं.

पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूल आणि सामजिक कार्यकर्ते संदीपशेठ काटे यांच्या जनसंपर्क कार्यालयात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करीत त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे संस्थापक संदीपशेठ काटे बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे वेदिका जाधव, पल्लवी वाघ, प्राजक्ता पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका सुविधा महाले, धीरज काटे आदी उपस्थित होते.

दरम्यान विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित मराठी, हिंदी व इंग्रजीमध्ये भाषणे, नाटिका, पोवाडे व गीते सादर केली. महाराजांच्या जीवनावर आधारित लघुनाटिकेचे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान केली होती.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version