Spread the love
नवनिर्मिती व्दारे सामाजिक समस्यांचे निराकरण व्हावे – डॉ मणीमाला पुरी
पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग वास्तविक जगातील समस्यांचा विचार करून नवनिर्मिती केली तर सामाजिक समस्यांचे निराकरण करणे शक्य होईल.
  ‘समाज विकासासाठी समाज’ या मूलमंत्रावर लक्ष केंद्रित करून विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन पीसीयुच्या प्रभारी कुलगुरू डॉ. मणीमाला पुरी यांनी केले.
    पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचलित (पीसीईटी) पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या वतीने (पीसीयु) विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना, विचारांना चालना देण्यासाठी ‘आयडियाथॉन – २४’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पीसीईटी शैक्षणिक समूहातील शाळांमधील दीडशे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. पीसीयुच्या ‘नाविन्यपूर्ण संशोधन आणि विकास’ विभागाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्र कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे, डॉ. सागर पांडे, डॉ. नीरू मलिक, अंकुश दहत, तुषार महोरे आदी उपस्थित होते.
   विद्यार्थ्यांच्या नियमित अभ्यासक्रमा बरोबरच विचारांना, कल्पना, कौशल्यांना, संशोधनाला चालना मिळाली पाहिजे; या उद्देशाने पीसीयुने विद्यार्थ्यांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यामाध्यमातून देशाला सुजाण नागरिक, उत्तम संशोधक मिळतील असा विश्वास डॉ. सुदीप थेपडे यांनी व्यक्त केला.
   डॉ. अपर्णा पांडे, प्रा. डॉ. रचना पाटील हे स्पर्धेचे परीक्षण केले. या स्पर्धेत ३१ सहभागी संघांमधून तीन संघ विजयी झाले.
     पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सहभागी संघांना शुभेच्छा दिल्या.
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version