चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी सुरक्षा व सकारात्मक दृष्टीकोन वाढविण्यासाठी पालक उदबोधन वर्गाचा अनोखा यशस्वी उपक्रम

Spread the love

चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळ संचलित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी सुरक्षा व सकारात्मक दृष्टीकोन वाढविण्यासाठी पालक उदबोधन वर्गाचा अनोखा यशस्वी उपक्रम आयोजित केला होता.

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळ संचलित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात विद्यार्थी सुरक्षा व सकारात्मक दृष्टीकोन वाढविण्यासाठी पालक उदबोधन वर्गाचा अनोखा यशस्वी उपक्रम आयोजित केला होता.

सकारात्मक विचार हीच शक्ती असते. आपण ज्या पद्धतीने विचार करतो, तसेच प्रत्यक्षात आपल्या बाबत घडत असते. यश, कीर्ती, नाव, प्रतिष्ठा, मान, सन्मान सर्वकाही सकारात्मक दृष्टिकोनातून आपल्याला मिळते. मुलांच्या मनामध्ये असलेली भीती घालवण्यासाठी अगदी लहान वर्गांपासूनच सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणारे affirmations मुलांच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण होतो आणि विद्यार्थी नेहमीच सकारात्मक दृष्टीने विचार करू लागतात. याचा खूप चांगला प्रभाव त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर पडतो. नेहमी चांगलेच विचार त्यांच्या मनात बिंबले जातात आणि विद्यार्थी अत्यंत आनंदमय वातावरणात अपेक्षित यश प्राप्त करतो.
याच विचारांनी प्रेरित होऊन चिंचवडच्या विकास शिक्षण मंडळ संचलित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात सर्व पालकांकरिता पालक उदबोधन वर्गाचे आयोजन मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 ते गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 या कालावधीत करण्यात आले. सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांमध्ये सलग तीन दिवस पालकांना याबाबत अत्यंत प्रभावीपणे मार्गदर्शन करण्यात आले.

या उद्बोधन वर्गाच्या उदघाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष  जगदीश जाधव, सचिव  संजय जाधव, संचालक श विजय जाधव आदी  उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करून त्यांचा आत्मविश्वास वाढविण्याकरिता लॉ ऑफ अट्रॅक्शन अत्यंत महात्वाच्गे असते. या समुहाच्या चंदीगड येथून आलेल्या श्रीमती मृदुल सायनी या उद्बोधन वर्गाच्या प्रमुख म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या समवेत तज्ञ मार्गदर्शक डॉक्टर अमृता जोशी आणि श्रीमती मोनिका मेहता, मुंबईचे सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक  रवींद्र बडगुजर, शालेय विद्यार्थी सुरक्षा समिती अंतर्गत दामिनी पथकाच्या पोलीस अधिकारी श्रीमती रेश्मा पुनावणे, पालक संघाचे अध्यक्ष  हर्षदा दुरगुडे, ऍड.युवराज गटे हेही सदरप्रसंगी उपस्थित होते.
संस्थेतर्फे सर्व उपस्थितांचे मन:पूर्वक स्वागत करण्यात आले आणि मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

विद्यालयाचे पर्यवेक्षक  दत्तात्रय भालेराव यांनी आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टीच्या निर्माण करण्याकरिता संस्थेत राबविल्या जाणाऱ्या उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती सांगितली. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेली भीती नाहीशी करून त्यांच्यामध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करण्याकरिता लॉ ऑफ अट्रॅक्शन च्या माध्यमातून विद्यालयात विद्यार्थ्यांकरिता संस्कार वर्ग राबविले जातात. विद्यार्थ्यांकरिता राबविल्या जाणाऱ्या या नवोदित उपक्रमांची दखल घेऊन शासनाने शिक्षक निर्मितीच्या D . Ed. अभ्यासक्रम पुस्तकामध्ये विद्यालयाचा आणि येथील उपक्रमांचा समावेश केला आहे. सर्व भौतिक आणि शैक्षणिक सुविधांनी युक्त आणि विविध विषयांच्या स्वतंत्र प्रयोगशाळा असलेली ही भारतातील पहिलीच शाळा असावी, असेही या पुस्तकात नमूद केले आहे. सर्व पालकांनी याबाबत मनःपूर्वक समाधान व्यक्त केले आणि विद्यालयाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांना चांगल्या गोष्टीसाठी प्रेरित करण्याकरिता आणि अभ्यासाविषयी तथा शिस्तीविषयी आवड निर्माण करण्याकरिता विद्यार्थ्यांना दर महिन्यात प्रत्येक वर्गाच्या प्रत्येक तुकडीतून एक विद्यार्थी हा आदर्श विद्यार्थी म्हणून निवडला जातो. मान्यवरांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात येते. याकरिता विविध निकष असलेली नियमावली तयार करण्यात आलेली आहे त्यानुसारच या विद्यार्थ्यांची निवड होते सदर प्रसंगी अशा आदर्श विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. पालकांनी अशा प्रेरणादायी उपक्रमाबद्दल संस्थेचे मनापासून कौतुक केले.

क्रीडा शिक्षक  शब्बीर मोमीन यांनी पालकांना सदर उद्बोधन वर्गाचा हेतू समजावून सांगितला. काही पालक अनवधानाने विद्यार्थ्यांशी चुकीच्या पद्धतीने वागतात व बोलतात. त्यामुळे पाल्याचा आत्मविश्वास कमी होतो आणि तो नकारात्मकतेकडे वळतो. अशा वागण्याचा आणि बोलण्याचा त्या पाल्याच्या बुद्धीवर अत्यंत गंभीर परिणाम होत असतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन च्या साह्याने राबविण्यात येणाऱ्या संस्कार वर्गांच्या माध्यमातून संस्था मुलांमध्ये लहानपणापासूनच प्रचंड आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते मुलांमध्ये वैचारिक बदल आणि प्रचंड आत्मविश्वास निर्माण करून त्यांचं भवितव्य उज्वल करण्यासाठी संस्था नेहमी प्रयत्नशील असते आणि असे नवनवीन उपक्रम राबवत असते. बालवर्गापासून बारावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांकडून शाळा भरल्यानंतर पहिल्या पाच मिनिटांमध्ये सर्व विद्यार्थ्यांकडून अॅफरमेशन्स वधवून घेतले जातात. I am Powerful. I am strong. I am confident. I am the winner. I am energetic. I am blessed. अशा प्रकारच्या affirmations मुळे विद्यार्थी नेहमीच सकारात्मक दृष्टीने विचार करू लागतात.

त्यामुळे पालकांनीही नेहमी सकारात्मक विचाराने आपल्या पाल्याचे वागणे आणि बोलणे अत्यंत आवश्यक आहे, ही बाब पालकांनी लक्षात घेतली पाहिजे. आपल्या पाल्याची बोलताना नेहमी त्याची स्तुती करावी त्याचा आत्मविश्वास वाढेल अशा पद्धतीने त्याच्याशी बोलावे छोट्या छोट्या गोष्टींमधून त्याचे कौतुक करावे आणि केलेल्या कामांबद्दल त्याचे कौतुक करावे जीवनात प्रत्यक्षात कसं जगायचं कसं उत्साही राहायचं कसं आनंदी राहायचं आणि स्वतःच उज्वल भविष्य स्वतःच कसं घडवायचं हे आपला पाल्य यातून नक्कीच शिकतो मुलांचं उज्वल भवितव्य घडवण्यासाठी लॉ ऑफ अट्रॅक्शन त्यांना शिकवण अत्यंत गरजेचं आहे अशा शब्दांत पालकांना सदर प्रसंगी समजावून सांगण्यात आले. अशा प्रकारच्या विचारांनी प्रेरित होऊन आपल्या आयुष्यात यशाचे शिखर गाठलेल्या यशस्वी व्यक्तिमत्त्वांची उदाहरणे देऊन पालकांना प्रेरित करण्यात आले.

प्रमुख पाहुणे तथा मार्गदर्शक श्रीमती मृदुल सायनी, डॉक्टर अमृता जोशी तथा श्रीमती मोनिका मेहता यांनी विविध व्यावहारिक उदाहरणांच्या माध्यमातून अत्यंत सहजपणेआणि अत्यंत मौलिक शब्दांत सर्व पालकांचे प्रभावीरीत्या मार्गदर्शन केले मेडिटेशनच्या सहाय्याने ताण-तणाव कसा दूर करता येईल याचे प्रात्यक्षिक पालकांकडून करवून घेतले पाल्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याकरिता पालकांनी याबाबत आत्मचिंतन करणे अत्यंत गरजेचे आहे. पालकांनी परिस्थितीनुसार स्वतःमध्ये सकारात्मक परिवर्तन केल्यास पालक आणि पाल्य यांच्यातील नाते अत्यंत दृढ होऊन पाल्य हा पालकाशी मोकळ्या मनाने वागू लागतो. एखादा पाल्य चुकीचे वागत असेल, तर तो तसा का वागतो, यामागची कारणे शोधून पालकांनी स्वतः पाल्याच्या मनस्थितीचा विचार करून त्याप्रमाणे वागावे आणि त्याच्याशी नेहमी चांगले बोलावे त्याचे वेळोवेळी कौतुक करावे त्याला चांगल्या कामासाठी प्रेरित करावे. पालकांनी आपल्या पाल्याला वेळ देऊन त्याच्याशी रोज संवाद साधणे, याची मानसिक स्थिती आणि त्याच्या भावना समजून घेणे खूप महत्त्वाचे असते. याबाबत अत्यंत प्रभावीपणे पालकांचे प्रबोधन करण्यात आले. अशा पवित्र संकुलाचीनिर्मिती करणाऱ्या संस्थापक आदरणीय कै. आण्णासाहेब जाधव यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी विनम्र अभिवादन केले. त्यांच्या अनन्यसाधारण कारकीर्दीबाबत मनापासून त्यांचे आभार मानले. अशा प्रकारच्या दर्जेदार आणि उपयुक्त अशा उदबोधन वर्गांच्या आणि संस्कार वर्गांच्या आयोजनाबाबत त्यांनी संस्थेचे अध्यक्ष श्री. जगदीश जाधव मनापासून आभार मानले. अशा प्रकारचे उदबोधन वर्ग तथा संस्कार वर्ग राबविणारी भारतातील ही एकमेव शाळा असून अशा शाळेत विद्यार्थ्यांकरिता काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी मनापासून समाधान व्यक्त केले.

दामिनी पथकाच्या श्रीमती रेश्मा पुनावळे यांनी पालकांना Good Touch, Bad touch याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून पाल्याच्या सुरक्षिततेबाबत पालकांची कर्तव्य आणि त्यांच्या जबाबदाऱ्या समजावून सांगितल्या. आपल्या पाल्याच्या सवयी कशा आहेत, त्याची संगत कोणाशी आणि कशी आहे, कोणत्या बाबींवर पालकांनी लक्ष द्यावे आणि कोणत्या बाबी टाळाव्यात याबाबत त्यांनी पालकांचे मार्गदर्शन केले आणि पालकांनी जागरूक राहण्याचे आव्हान केले. पालकाक संघाच्या अध्यक्षा सौ. हर्षदा दुरगुडे यांनीही पालकांना आपले अनुभव सांगून संस्थेच्या या नवोदित उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका  सुषमा संधान यांनी सर्व उपस्थित मान्यवराचे आणि पालक वर्गाचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button