महर्षि आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठानच्या वतीने महर्षि आनंद सेवा पुरस्कार वितरण संपन्न

आळंदी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आळंदी येथील जैन श्रावक संघ यांच्या सहयोगाने ,महर्षि आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठान यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या कर्मठ कार्यकर्त्यांना दरवर्षी महर्षि आनंद सेवा पुरस्काराने सन्मानित केले जाते. याही वर्षी आळंदी येथील आनंद मंगल सभागृहात आनंदशिष्य रत्न प पू प्रशांत ऋषीजी म सा आणि मधुर व्याख्यानी प पू विजयस्मिताजी म. सा. यांच्या दीक्षा दिनाच्या निमित्ताने त्यांच्या मंगलमय सानिध्यात हा महर्षि आनंद पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. दापोडी येथील श्री संघाचे सचीव , पिंपरी चिंचवड जैन महासंघाचे उपाध्यक्ष दिलीप भन्साळी यांना धार्मिक क्षेत्रातील अनेक संस्थांच्या माध्यमातून संत आणि समाजसेवा करण्याच्या त्यांच्या कार्याबद्दल “महर्षी आनंद संत समाजसेवा पुरस्कार” वितरित करण्यात आला. तसेच पुणे येथील अरिहन्त जागृती मंच चे कार्याध्यक्ष व जैन सोशल ग्रुप पुणे आनंद चे संस्थापक श्री विजयजी पारख यांना जैन धर्माची अस्मिता आणि जागृती क्षेत्रातील त्यांच्या कार्याबद्दल त्यांना “महर्षि आनंद जिन धर्म सेवा पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले, तसेच औंध येथील पत्रकार आणि सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील कार्यकर्ते श्री रवींद्र बलाई यांना त्यांच्या “संत सेवा आणि विहार सेवा क्षेत्रातील’ उल्लेखनीय कार्याबद्दल” महर्षी आनंद विहार सेवा पुरस्काराने” सन्मानित करण्यात आले .
प्रतिष्ठान च्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्थेसही पुरस्कृत करण्यात येते. त्यामध्ये ह्या वर्षी “नवचैतन्य सामाजिक संस्था चिखली” या संस्थेने गेल्या तीन वर्षात समाज प्रबोधनाचे, परिवार कल्याणाचे अनेक उपक्रम परिवार राबविले आहेत आणि महावीर रोटीच्या नावाने अन्नदानाचे अनेक कार्यक्रम घेण्यात आले आहेत. त्या संस्थेला यावर्षीचा ” महर्षि आनंद समाज प्रबोधन सेवा” हा पुरस्कार यावेळी देण्यात आला नवचैतन्य सामाजिक संस्थेच्या वतीने अध्यक्षा श्रीमती अनिता नहार आणि त्यांच्या पदाधिकारी सदस्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. हे सर्व पुरस्कार महर्षि आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठानचे “अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ , आळंदी चे अध्यक्ष सुरेशकाका वडगांवकर तसेच प्रतिष्ठानचे पदाधिकारी श्री चंद्रशेखर लु़ंकड, प्रणित बागमार, विलासकुमार पगारिया, अमित नहार, अविनाश बोरुंदिया, मनोज लुंकड, संदीप चोरडिया, वसंतलाल बोरा, या सर्वांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले . महर्षि आनंद सेवा भक्ती प्रतिष्ठानच्या वतीने गेल्या नऊ वर्षांमध्ये २० पेक्षा जास्त नेत्र चिकित्सा शिबिरे व मोफत चष्मे वाटप शिबिरांचे सातत्याने आयोजन केले गेले.
या शिबिरा़मध्ये आजपर्यंत सुमारे 3000 पेक्षा जास्त नागरिकांची डोळे तपासणी करण्यात आली आणि 2500 पेक्षा जास्त लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. काही जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली.प पू प्रशांतऋषीजी म सा यांच्याच प्रेरणेने ह्या प्रतिष्ठानची स्थापना झाली आहे.प पू प्रशांतऋषीजी म. सा. आणि प पू विजयस्मिताजी म .सा . यांना त्यांच्या दीक्षा दिनाच्या निमित्ताने प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया यांनी आणि अनेक मान्यवरांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या..









