भाजप कदापि सोडणार नाही- आमदार अश्विनी जगताप

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार श्रीमती अश्विनी जगताप यांनी आज भारतीय जनता पार्टी कदापि सोडणार नाही हे सांगून पक्षावरील आपले प्रेम व पक्षावरील निष्ठा सिद्ध करून दाखवली आहे.
उमेदवारी मिळो अथवा नाही, परंतु भाजप कदापि सोडणार नाही. अशी भूमिका विद्यमान आमदार अश्विनी जगताप यांनी जाहीरपणे मांडली आहे. गेल्या काही दिवसांपासून अश्विनी जगताप हा भाजप सोडून तुतारी हाती घेणार अशा बातम्या समोर आल्या होत्या. त्यावर आता त्यांनी भाजप सोडणार नसल्याचे सांगितले आहे.
माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी अलीकडेच भाजप सोडत असल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवत भाजप सोडत असल्याचे सांगितले. यातच माझ्यासह २० माजी नगरसेवक देखील भाजप सोडल्याचा दावा केला होता. यातच अश्विनी जगताप या देखील हाती तुतारी हातात घेणार. अशा बातम्या काही समाज माध्यामांवर झळकल्या. यावय माझी तब्येत ठिक नसल्याने मी घरात च आहे. कोणत्याही नेत्यांना भेटण्याचा प्रश्नच येत नाही. कारण तो भाऊंचा विचार नाही. असे अश्विनी जगताप यांनी सांगितले
जिल्हाध्यक्ष शंकर भाऊ जगताप यांच्याबरोबरही कसलेही मतभेद नसल्याचे त्यांनी जाहीररीत्या सांगितले आहे. उमेदवारी बाबतीत सुद्धा पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल असे सांगून त्यांनी मीडिया मध्ये आणि सोशल मीडियामध्ये पसरवल्या जाणाऱ्या निगेटिव्ह प्रचाराला पूर्णपणे खोडून काढले आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातील माजी जिल्हा उपाध्यक्ष राम वाकडकर आणि माजी नगरसेवक संदीप कस्पटे यांनी जरी आपल्या भाजप प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठी यांच्याकडे पाठविला असला तरी पक्ष नेतृत्वाने त्यांचा राजीनामा स्विकारला नाही. पक्ष नेतृत्व स्वतः त्यांच्याशी चर्चा करीत आहेत.
जिल्हाध्यक्ष शंकर भाऊ जगताप हे देखील राम वाकडकर आणि संदीप कस्पटे या दोघांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. दोघेही भाजपचेच कार्यकर्ते असल्यामुळे ही घरातलीच नाराजी आहे. जिल्हाध्यक्ष स्वतः कुटुंबाचे प्रमुख म्हणून ही नाराजी दूर करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहेत. राम वाकडकर संदीप कस्पटे आणि इतर कोणीही पक्ष सोडून जावे असे स्वतः जिल्हा अध्यक्ष आणि आमदार अश्विनी जगताप यांना अजिबात वाटत नाही. लवकरात लवकर भारतीय जनता पक्षाचा हा घरातीलच रुसवा फुगवा आणि जे काही समज गैरसमज असतील ते घरातल्या घरातच मिटवले जातील यासाठी पुर्ण प्रयत्न केले जातील.













