ताज्या घडामोडीपिंपरी

अथांग जनसागराच्या साक्षीने पिंपळे सौदागर मधील भव्य दिव्य असा रावण दहन सोहळा संपन्न

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज )- विजयादशमी निमित्ताने शनिवार नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन यांच्या सौजन्याने पिंपळे सौदागर याठिकाणी पिंपरी-चिंचवड, पुणे शहरातील सर्वात भव्य दिव्य असा रावण दहन कार्यक्रम संपन्न झाला. यंदाचा विजयादशमी कार्यक्रम पिंपळे सौदागरच नव्हे तर संपूर्ण शहरासाठी आकर्षक ठरला.जय श्रीराम नावाचा जयघोष करीत रावणाचा प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

तीन दिवसांपूर्वीच भारतातील सर्वात आदरणीय आणि यशस्वी  उद्योगपती स्व.रतन टाटा यांनी जगाचा निरोप घेतला यामुळे या कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी सर्व पिंपळे सौदागर वासिया तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेले अक्षय फटे यानी हनुमान पात्र साकारत उपस्थितांचे लक्ष वेधले. तसेच या कार्यक्रमात तरुणाईला वेढ लावलेल्या गुलाबी साडी गाणं फेम प्राजक्ता घाग , बॉईज-३ फेम अभिनेत्री विदुला चौघुले,बॉईज-२ फेम अभिनेत्री पल्लवी पाटील, अभिनेत्री मोहिनी अवसरे आणि मुळशी पॅटर्न फेम प्रसिद्ध अभिनेते श्री रमेश परदेशी (पिट्ट्या भाई ) या प्रमुख पाहुण्यांनी आपल्या विशेष शैलीत उपस्थित नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या आवडत्या गाण्यावर ठेका धरून, चित्रपटातील फेमस डायलॉग म्हणत मनोरंजन करीत कार्यक्रमाची शोभा वाढवली. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज या चित्रपटाच्या टीमच्या उपस्थितीत या चित्रपटाचे टिझरचे प्रदर्शन करण्यात आले तसेच फुलवंती या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी एवढे भव्य व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले.

या कार्यक्रम दरम्यान कुणाल मोरे यांचे डांस फ्लोर स्टुडियोच्या तसेच स्टुडिओ २४ ग्रुपने विविध गाण्यांवर नृत्य करीत जमलेल्या नागरिकांनीही जल्लोष करीत धुरळा उडवला.

दसऱ्याच्या दिवशी भगवान श्रीराम यांनी लंकापती रावणाचा वध करून वाईटावर चांगल्याचा , सत्याचा असत्यावर, न्यायाचा अन्यायावर तसेच नीतीचा अनीती वर विजय मिळवला होता. रावणाची दहा डोकी दहा नकारात्मक प्रवृत्तीचे प्रतीक मानली गेली आहेत. ती प्रवृत्ती म्हणजे वासना,गर्व,अहंकार, मोह,क्रोध,लोभ, मत्सर,द्वेष व भय….. आणि या नकारात्मक प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी विजयादशमी या दिवशी रावणाचे प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले जाते.केवळ रावणाच्या प्रतिमेचे दहन केले म्हणजे आपण प्रभू श्रीराम यांच्या सारखे मर्यादा पुरषोत्तम होऊ शकत नाही तर त्यासाठी आपल्यामध्ये असलेले रावण सारखे नकारात्मक प्रवृत्तीचा त्याग केला पाहिजे आणि प्रभू श्रीराममध्ये असलेले सकारात्मक गुण आत्मसात केले पाहिजे. स्त्रियांना बरोबरीची व सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. तन मन सदृढ करण्याचा दृढनिश्यय करून नकारात्मक गुणांवर मिळवलेला विजय आणि नवीन संकल्पासाठी केलेले सीमोल्लंघन हेच खरे विजयादशमीचे फलित आहे.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रांत कार्यकारणी सदस्य  हेमंत हरहरे,आमदार अमित गोरखे,विश्व हिंदू परिषदेचे  कुणाल साठे,जेष्ठ नेते  भाऊसाहेब भोईर,  नगरसेवक  चंद्रकांत अण्णा नखाते, नवनाथ जगताप, राजेंद्र जगताप,  राजेंद्र साळुंखे,  संतोष बारणे,  सिद्धेश्वर बारणे,  निलेश बारणे, राजू लोखंडे,  विनायक गायकवाड, विठ्ठल भोईर, राजेश जाधव, राम वाकडकर , नगरसेविका श्रीमती चंदाताई लोखंडे  निर्मला कुटे, श्रीमती सुषमा तनपुरे, व पिंपळे सौदागर परिसरातील तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड,पुणे शहर मधील सर्वात मोठे रावण दहन कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांचे,नागरिकांचे, पोलीस प्रशासनाचे,वाहतुक विभाग प्रशासन,अग्निशामक दल तसेच पालिका अधिकारी वर्ग यांचे नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन मार्फत आभार व्यक्त करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.
चेतन अग्रवाल, नीतू अग्रवाल यांनी या कार्यक्रमात अँकरिंग केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button